Tuesday, January 2, 2024

Imp

मंत्र गजर सामर्थ्य लीला:                                  "रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्था सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा"

I chant and he cares
I chant and he protects
I chant and he helps
I chant and he comes down
I chant and he lifts me
I chant and he cures me

Capacity to chant is his grace only

Grace means unmerited favour. Unmerited help. Unmerited compassion. Unmerited provision.

P. P. Sadguru Shri Dr.Aniruddha Joshi

Saturday, December 30, 2023

कथामंजिरी. २

कथामंजिरी. २
परमपूज्य अनिरुद्ध बापू
भाग ४६

पंचमहाभूते,मानवी संकल्प आणि ईश्वरी संकल्प याबाबत बापू सुंदर विश्लेषण करतात.
मागील भागात आपण पाहिले की महर्षी शतानंद आश्रमातील पायवाटेचे रुपांतर नदीमध्ये करतात.यामुळे शृंगादित्य त्यांना प्रश्न विचारतात.तर म.शतानंद हातातील कुंडलीतील पाण्याचे रुपांतर भल्यामोठ्या स्थिर अशा जलस्तंभात करतात.यामुळे सर्व आश्चर्यचकित होतात.
तेव्हा राजपितामही गोदावरीमाता म्हणतात की असा कुठलाही चमत्कार हा मायेत अडकलेल्या सामान्य माणसाला दिसू न शकणार्‍या भौतिक घटनांचा परिपाक असतो.
हे जल वाहत नसता एका जागीच स्थिर राहणे यामध्ये एक संकल्प आहे. आकाश,वायू,अग्नि,जल ,पृथ्वीतत्व ही पंचमहाभूते परस्परविरोधी गुणधर्माची दिसत असली तरीदेखिल कुठल्यातरी संकल्पानुसार एकमेकांच्या विरुद्ध कार्य करतात किंवा एक-दुसर्याला वाढविण्याचे कार्य करतात.हा संकल्पच ह्या सृष्टीला व्यापून उरलेला असतो.मानवी संकल्पाला आधार देणारा,वाढविणारा,संतुलित ठेवणारा,प्रत्यक्षात आणणारा 'एक महासंकल्प'आहे.
मानवाचा प्रत्येक संकल्प  हा त्या 'महासंकल्पाचा'एक अंश असतो.व तो  'महासंकल्प ' म्हणजेच अखिल ब्रह्मांडाचा एकमेव कर्ता असणारा स्वयंभगवान.
त्याला जाणल्याशिवाय काहीच जाणता येत नाही व कुठलाही मानवी संकल्प अपूर्णच राहतो.
जलाचे जलतत्वही तोच आणि अग्नीचे तेजही तोच.

हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध बापू

Friday, December 29, 2023

कथामंजिरी २

कथामंजिरी २
परमपूज्य अनिरुद्ध बापू
भाग ४७
पंचमहाभूते,मानवी संकल्प व ईश्वरी संकल्प याविषयी सांगत असतानाच परमपितामही गोदावरीदेवींना त्या पुत्र पराक्रमादित्य यांच्यावेळी गरोदर असतानाची आठवण होते.त्यांना सतत ब्रह्ववादिनी अहिल्यामातेच्या सहवासात रहावे,तिच्या आश्रमांत वास्तव्य करावे, ब्रह्मर्षि गौतमांना ध्यान करताना पहावे,आणि सतत ईश्वरचिंतनातं रहावे अशी ओढ लागली होती.म्हणून त्या ब्रह्मर्षि गौतमांच्या आश्रमात येऊन राहू लागल्या.तेथे त्या स्वयंभगवानाची भजने ऐकत,न्यायशास्त्र ऐकत. 
गर्भवती अवस्थेत त्यांना आंबट व तिखट पदार्थ अगदी पाहवतही नसत.वासही सहन होत नसे.तेव्हा ब्रह्मर्षि गौतम त्यांना म्हणाले.कन्या गोदावरी तुझ्या पोटी सूर्यप्रतापी अआणि अध्यात्मिक तेजाने परिपूर्ण असा पुत्र जन्मास येणार आहे.त्या गर्भातल्या सात्विक तेजाने तुला तिखट व आंबट पदार्थ आवडेनासे झाले आहेत.परंतु त्याला साम्राज्य चालवायचे आहे,वाईट संकल्पांशी युद्ध करायचे आहे,अधर्माचा पारिपत्य करायचे आहे.ह्यामुळे त्याला या दोन रसांची ओळख असणे आवश्यक आहे.
त्यानंतर त्यांनी एका द्रोणात लोणच्याचा एक थेंब व दुसर्‍या द्रोणात मधुर पाकाचा थेंब ठेवला.थोड्याच वेळात त्या दोन्ही थेंबांपासून दोन स्तंभ तयार झाले व एकमेकांशी जोडले गेले.ते एकमेकांत मिसळत होते व काही वेळाने पुन्हा वेगवेगळी झाली.
ब्रह्मर्षि गौतमांच्या सांगण्यावरुन गोदावरीदेवींनी त्या दोन्हींची चव पाहण्यास सांगितले.तेव्हा ते लोणचे मधुर लागत होते.
ब्रह्मर्षि गौतम म्हणतात की हा सर्वकाही भावनांचा खेळ आहे आणि भावनांची निर्मिती हा अन्नाचा खेळ आहे.
जोपर्यंत मनुष्य स्वयंभगवानाशी पूर्णपणे जोडला जात नाहीतोपर्यंत अन्न त्या मनुष्याच्या भावना निर्माण करते,बदलविते किंवा नष्ट करते.
परंतु एकदा का मनुष्य स्वयंभगवानाशी पूर्णपणे जोडला गेला की अन्न केवळ शरीरपोषणाचे कार्य करते आणि मन व अंतःकरण ह्यांच्यावर सत्ता फक्त भगवंताची चालते.कन्ये तुला व तुझ्या पुत्राला असेच बनावयाचे आहे.पंचमहाभूते कितीही प्रबळ असली तरीदेखील स्वयंभगवानाच्या तेजाच्या एका अतिसूक्ष्म अंशापुढेही अतिशय कमकुवत ठरतात व ही गोष्ट केवळ अन्नाच्या बाबतीतच नव्हे तर मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक घटनेच्या संदर्भात सत्य आहे.म्हणूनच भोजन करतेवेळेस स्वयंभगवानाचे नामस्मरण करावे.ते अन्न खरोखरच दिव्य प्रसादाचे कार्य करते.
हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध बापू

Monday, December 4, 2023

श्रीगंगा त्रिवेणी Algorithm (Shree Ganga Triveni-algorithm)- photo

श्रीगंगा त्रिवेणी Algorithm (Shree Ganga Triveni-algorithm)

श्रीगंगा त्रिवेणी Algorithm (Shree Ganga Triveni-algorithm)
Sadguru Aniruddha Bapu
Sat Sep 21 2013
परवा म्हणजे १९ सप्टेंबर २०१३ रोजी सद्‌गुरू बापूंनी ’श्रीगंगा त्रिवेणी Algorithm’ सर्व श्रध्दावानांना समजावले. ह्या वेळेस बापूंनी Pascal Triangle चा देखील या algorithm शी असलेला संदर्भ दिला. श्रीगंगा त्रिवेणी algorithm बद्दल बोलताना बापू म्हणाले, "गंगा - यमुना - सरस्वती या तीन नद्यांचा जेथे संगम होतो त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. गंगा, यमुना व सरस्वती ह्या नद्या आपल्या देहात इडा, पिंगला व सुषुम्ना नाड्यांच्या रूपात असतात". मनुष्याच्या कपाळाच्या मध्यभागी म्हणजेच आज्ञाचक्रामध्ये ह्या तीन नाड्यांचा त्रिवेणी संगम होतो. सुषुम्नेमध्ये हनुमंताचा संचार असतो म्हणजेच तिच्यात महाप्राणाचे साम्राज्य असते.

आमच्या मनातील गंगा, यमुना सरस्वतीचा संगम आम्हांला माहिती असणे आवश्यक आहे. ह्या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमात स्नान केली की आपल्या सगळ्या पापांचं क्षालन होतं असा सिध्दांत आहे. पण त्रिवेणी संगमात खरे स्नान करणे म्हणजे आपल्या मनातल्या गंगा, यमुना सरस्वतीच्या संगमात म्हणजेच इडा, पिंगला व सुषुम्नेच्या संगमात स्नान करणे; व ही संधी प्रत्येकाला मिळणे शक्य आहे.

वरील आकृति आपल्या देहातील इडा, पिंगला व सुषुम्ना म्हणजेच गंगा, यमुना व सरस्वतीचे कार्य दर्शविते. या त्रिकोनात १ ते ९ व ० हे अंक एका ठराविक क्रमाने येतात. फक्त सुषुम्ना नाडीवर आपल्याला शून्य दिसतो. ही शून्यावस्था म्हणजेच शांत-तृप्त अवस्था म्हणजेच पूर्णत्व. हनुमंत पूर्ण आहे. म्हणून त्याचा सुषुम्ना नाडीमध्ये संचार असतो. ह्या सुषुम्नेलाच ’ज्योतिषमति’ देखील म्हणतात कारण ही पुढचे जाणते.

पण या गंगा-त्रिवेणीच्या त्रिकोणात स्नान कसं करायचं? आपल्या आवडत्या देवाच्या प्रतिमेला (मुर्ती / फ्रेम) अभिषेक करताना ताम्हणाखाली हा श्रीगंगा त्रिवेणी algorithm काढलेला कागद ठेवावा. यामुळे गंगा-त्रिवेणी संगमाचे पावित्र्य अभिषेकाच्या तीर्थात अवतरते. त्यानंतर देवाच्या अभिषोक्त प्रतिमेला अत्यंत प्रेमाने व काळजीपूर्वक पुसावे. अभिषेक केल्यावर हे तीर्थ गंगा, यमुना, सरस्वतीचे स्मरण करत आपण प्राशन करावे. हे जल गंगा, यमुना, सरस्वतीचेच आहे, हा भाव ठेवावा. त्याचबरोबर आपल्यावर जे कोणी खरंखुरं प्रेम करतं त्या प्रत्येकासाठी हे तीर्थ आपण प्राशन करत आहोत हा भाव सुध्दा असावा. तीर्थ घेतल्यावर तो ओला हात आपले दोन्ही डोळे, आज्ञाचक्र व डोक्याच्या मागे म्हणजे Circle of Willis च्या ठिकाणी लावावे. असा अभिषेक जर आपण रोज केला तर ते आपल्याला ह्या त्रिवेणी संगमात स्नान करण्याप्रमाणेच आहे.

हे चिन्ह काढताना वरती श्रीगंगा त्रिवेणी लिहावे. त्याच्याखाली मध्यभागी algorithm चे चिन्ह काढावे. चिन्हाच्या खाली आपल्या आवडत्या देवाचे नाव लिहावे. कागदावर, कपड्यावर लिहून देव्हार्‍याच्या खाली हे algorithm ठेवले तर श्रेयस्कर. समजा चुकून आपण ह्या प्रतिमेला हळद-कुंकू लावायला विसरलो तरीही चालेल. फक्त आपण जे करु ते प्रेमाने करावे. ह्या algorithmची प्रतिमा आपल्या गाडीत ठेवली तरी चालेल कारण, यात या प्रतिमेवर सूर्यकिरणांचा अभिषेक होतो. भारतीय संस्कृतीत सूर्यकिरणांचा अभिषेक हा अतिशय पवित्र व सर्वोत्तम मानला जातो. हे algorithm आपण रांगोळीमध्येही काढू शकतो व ह्यात कुठलेही रंग वापरले तरी चालतात. हे गंगा-त्रिवेणीचे चिन्ह आपण ज्या वस्त्रावर देव ठेवतो, त्या वस्त्राखाली ठेवले तर देवपूजेच्या वेळी आपल्या हातून काहीही चुका झाल्यास त्याची भिती बाळगायचे कारण नाही.

वरील आकृति आपल्या देहातील इडा, पिंगला व सुषुम्ना म्हणजेच गंगा, यमुना व सरस्वतीचे कार्य दर्शविते. या त्रिकोनात १ ते ९ व ० हे अंक एका ठराविक क्रमाने येतात. फक्त सुषुम्ना नाडीवर आपल्याला शून्य दिसतो. ही शून्यावस्था म्हणजेच शांत-तृप्त अवस्था म्हणजेच पूर्णत्व. हनुमंत पूर्ण आहे. म्हणून त्याचा सुषुम्ना नाडीमध्ये संचार असतो. ह्या सुषुम्नेलाच ’ज्योतिषमति’ देखील म्हणतात कारण ही पुढचे जाणते.

पण या गंगा-त्रिवेणीच्या त्रिकोणात स्नान कसं करायचं? आपल्या आवडत्या देवाच्या प्रतिमेला (मुर्ती / फ्रेम) अभिषेक करताना ताम्हणाखाली हा श्रीगंगा त्रिवेणी algorithm काढलेला कागद ठेवावा. यामुळे गंगा-त्रिवेणी संगमाचे पावित्र्य अभिषेकाच्या तीर्थात अवतरते. त्यानंतर देवाच्या अभिषोक्त प्रतिमेला अत्यंत प्रेमाने व काळजीपूर्वक पुसावे. अभिषेक केल्यावर हे तीर्थ गंगा, यमुना, सरस्वतीचे स्मरण करत आपण प्राशन करावे. हे जल गंगा, यमुना, सरस्वतीचेच आहे, हा भाव ठेवावा. त्याचबरोबर आपल्यावर जे कोणी खरंखुरं प्रेम करतं त्या प्रत्येकासाठी हे तीर्थ आपण प्राशन करत आहोत हा भाव सुध्दा असावा. तीर्थ घेतल्यावर तो ओला हात आपले दोन्ही डोळे, आज्ञाचक्र व डोक्याच्या मागे म्हणजे Circle of Willis च्या ठिकाणी लावावे. असा अभिषेक जर आपण रोज केला तर ते आपल्याला ह्या त्रिवेणी संगमात स्नान करण्याप्रमाणेच आहे.

हे चिन्ह काढताना वरती श्रीगंगा त्रिवेणी लिहावे. त्याच्याखाली मध्यभागी algorithm चे चिन्ह काढावे. चिन्हाच्या खाली आपल्या आवडत्या देवाचे नाव लिहावे. कागदावर, कपड्यावर लिहून देव्हार्‍याच्या खाली हे algorithm ठेवले तर श्रेयस्कर. समजा चुकून आपण ह्या प्रतिमेला हळद-कुंकू लावायला विसरलो तरीही चालेल. फक्त आपण जे करु ते प्रेमाने करावे. ह्या algorithmची प्रतिमा आपल्या गाडीत ठेवली तरी चालेल कारण, यात या प्रतिमेवर सूर्यकिरणांचा अभिषेक होतो. भारतीय संस्कृतीत सूर्यकिरणांचा अभिषेक हा अतिशय पवित्र व सर्वोत्तम मानला जातो. हे algorithm आपण रांगोळीमध्येही काढू शकतो व ह्यात कुठलेही रंग वापरले तरी चालतात. हे गंगा-त्रिवेणीचे चिन्ह आपण ज्या वस्त्रावर देव ठेवतो, त्या वस्त्राखाली ठेवले तर देवपूजेच्या वेळी आपल्या हातून काहीही चुका झाल्यास त्याची भिती बाळगायचे कारण नाही.

mantra gajar- धुलिकणपुरुष

तुलसीपत्र १६१६ 

कलियुगात भक्तीभाव चैतन्यात राहाण्याची, मंत्रगजर करण्याची गरज का आहे?

भरत - शुभदा संवाद 
भरत - हे भक्तिरसमयी शुभदे!
हा स्वयंभगवान आकाशरुपाने सर्वत्र आणि सदैव व्यापून राहिलेला असतो.

सत्ययुगात या स्वयंभगवानाच्या ह्या आकाश रुपातून अर्थात आकाशातूनच प्रत्येक श्रद्धावानाला सहजतेने ऊर्जा व सहाय्य मिळविता येते.

त्रेतायुगात पवित्र यज्ञातून निघणा-या धुरातून ह्या यज्ञ स्वरुप स्वयंभगवानाचे सहाय्य श्रद्धावानांना सहजतेने मिळू लागते.

द्वापायुगात ह्या स्वयंभगवानाच्या पूजनातून अर्थात स्वयंभगवानाच्या विविध रुपांच्या प्राणप्रतिष्ठित मूर्तींपासून हेच सहाय्य श्रद्धावानांना मिळविता येते.

परंतु कलियुगामध्ये एका बाजूला भक्ती करण्याचा वेळ कमी कमी होत जातो, भक्तीची गोडीही कमी होत जाते, मंदिराचे पावित्र्य देखील सामान्यजन व मंदिरसेवकही व्यवस्थित पाळू शकत नाहीत, अन्न व नैवेद्यही तेवढेसे शुद्ध नसतात, मंदिराच्या आजूबाजूला फक्त नफा कमावणा-यांचेच अस्तित्व वाढू लागते आणि दुस-या बाजूला तपश्चर्या, कठोर व्रते, ध्यान धारणा, पवित्र आचरण, समर्पण बुद्धी या घटकांचा लोप होत जातो व त्याचबरोबर अनैतिकता, पापे, दुराचार वाढू लागतात.

ह्यामुळे साध्यासुध्या मनुष्याला स्वयंभगवानापासून सहाय्य मिळविण्याचे सर्व मार्ग वापरता येत नाहीत व हे नीट जाणणारा स्वयंभगवान आपल्या अपत्यांवरील प्रेमामुळे धुलिकणपुरुष व स्त्रिया उत्पन्न करीत राहतो.
हे सर्व धुलिकणपुरुष व स्त्रिया भक्ती करु पाहाणा-या मानवांच्या त्रिविध देहांमध्ये स्वयंभगवानाचे सहाय्य स्वतः आणून थेट ओतत राहतात. श्रद्धावानाला काही करावेच लागत नाही.
सहाय्य करणा-या या धुलिकणपुरुषांना श्रद्धावानाच्या त्रिविध देहांत सहाय्य ओतण्यासाठी कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नसते.
परंतु या सहाय्याचा उपयोग करून घेण्यासाठी श्रद्धावानाला मात्र भक्तीभाव चैतन्यात राहण्याची आवश्यकता असते.
जो जो श्रद्धावान भक्तीभाव चैतन्यात राहतो, त्याच्या त्रिविध देहांत स्वयंभगवानाच्या सर्व प्रकारच्या ऊर्जा, ह्या अशा धुलिकणपुरुषांच्या माध्यमातून विविध कार्ये करु लागतात.
पृथ्वीवरील प्रत्येक धुलिकणाला सुद्धा हा स्वयंभगवान आपला दूत बनवू शकतो अर्थात धुलिकणपुरुष बनवू शकतो - केवळ त्याच्या चरणस्पर्शाने.

स्वयंभगवानाचे चरण धरणे, त्यांच्यावर आपले मस्तक टेकविणे, त्याच्या चरणांवर स्वत:ला समर्पित करणे, त्या चरणांची सेवा करणे आणि त्या चरणांना आपल्या हृदयात बसविणे हेच सर्व श्रद्धावानांसाठी सर्वश्रेष्ठ आहे.

या स्वयंभगवानाचे चरण आपण प्रेमाने पकडले तर आपल्या ह्या भौतिक स्थूल शरीरात सुद्धा आपोआपच असंख्य धूलिकणपुरुष तयार होतील. 
ही स्वयंभगवानाचीच योजना आहे त्याच्यावर निस्सीम प्रेम करणा-या श्रद्धावानांसाठी.

श्रद्धावानाला, हा स्वयंभगवान कधी आपल्यासाठी, आपल्याला सहाय्य करण्यासाठी असे तेजस्वी धूलिकणपुरुष उत्पन्न करील ह्याची वाट पाहण्याची  गरज उरणार नाही. आपणच जर त्याचे चरण पकडले  की मग वाट पाहणे थांबते.

भरत - श्रद्धावानहो! तो स्वयंभगवान कधी तुमच्या जीवनात पाय ठेवील याची वाट पाहत बसू नका, उठा! आणि त्याचे चरण आपल्या मस्तकावर, हातात आणि प्रेमाने हृदयात धारण करा. त्याचे कार्य तो करतच असतो आपण आपले कार्य करुया.

आणि आपले प्रमुख कार्य आहे त्याच्या दोन चरणांत राहण्याचे.

आणि त्याच्या दोन चरणांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भक्तीभाव चैतन्य.
आणि त्याच्या भक्तीभाव चैतन्यात राहाण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे मंत्रगजर.
रामनाम, रामकथा हे भक्तीभाव चैतन्याचे महाद्वार आहे.

अंबज्ञ
(Whtsapp group) 

Saturday, December 2, 2023

mantragajar-4

🙏

🔷  मंत्रगजराच्या केवळ *ध्वनी* मध्येच मनःशांती देण्याची ताकद आहे...मग तो *ध्वनी* मोठा असो की लहान...

-------------------

🔷 *शांतता आणि शाश्वतता हे स्वयंभगवानाचे श्रध्दावानांसाठीचे पहिल्या क्रमांकाचे गुण आहेत*

शाश्वततेशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय शाश्वतता नाही.

शाश्वत म्हणजे जे सतत आहे,नित्य आहे,नक्की आहे आणि कधीच नाश पावत नाही असे.

तत्कालिक शांती अर्थात दोन क्षणांची शांती मानवाला ब-याच वेळा मिळते परंतु *सतत टिकणारी मनःशांती* मात्र  केवळ आणि केवळ मंत्रगजरातूनच प्राप्त होते..कारण ती देणारा स्वयंभगवान *शांत-राम* आहे आणि *शाश्वत- राम* आहे.

------------------

🔷 शांत आणि शाश्वत असणाऱ्या त्रिविक्रमाचा मंत्रगजर श्रध्दावानांसाठी *शांतरसाचा* सुंदर स्त्रोत बनून येतो..

🔸 मौनातही शांतरस आहे 
      आणि
      बोलण्या व ऐकण्यातूनही शांतरस आहे.
🔸 एकाच जागी ध्यानस्थ बसण्यातही शांतरस आहे
      आणि
     मंत्रगजराचे मनोभावे केलेले गायन, वादन आणि नृत्य ह्यांमध्येही शांतरसच आहे.
🔸मृदंगाच्या व टाळांच्या तालावर केलेले सांघिक गायनसुध्दा शांतीच देते.
    आणि
    *केवळ* ह्या मंत्रगजराच्या शब्दांकडे पाहत राहणेसुध्दा शांतीच देते.

*(कथामंजिरी २-३०)*


श्रीराम...

Mantragajar imp-3

🙏

🔷  मंत्रगजराच्या केवळ *ध्वनी* मध्येच मनःशांती देण्याची ताकद आहे...मग तो *ध्वनी* मोठा असो की लहान...

-------------------

🔷 *शांतता आणि शाश्वतता हे स्वयंभगवानाचे श्रध्दावानांसाठीचे पहिल्या क्रमांकाचे गुण आहेत*

शाश्वततेशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय शाश्वतता नाही.

शाश्वत म्हणजे जे सतत आहे,नित्य आहे,नक्की आहे आणि कधीच नाश पावत नाही असे.

तत्कालिक शांती अर्थात दोन क्षणांची शांती मानवाला ब-याच वेळा मिळते परंतु *सतत टिकणारी मनःशांती* मात्र  केवळ आणि केवळ मंत्रगजरातूनच प्राप्त होते..कारण ती देणारा स्वयंभगवान *शांत-राम* आहे आणि *शाश्वत- राम* आहे.

------------------

🔷 शांत आणि शाश्वत असणाऱ्या त्रिविक्रमाचा मंत्रगजर श्रध्दावानांसाठी *शांतरसाचा* सुंदर स्त्रोत बनून येतो..

🔸 मौनातही शांतरस आहे 
      आणि
      बोलण्या व ऐकण्यातूनही शांतरस आहे.
🔸 एकाच जागी ध्यानस्थ बसण्यातही शांतरस आहे
      आणि
     मंत्रगजराचे मनोभावे केलेले गायन, वादन आणि नृत्य ह्यांमध्येही शांतरसच आहे.
🔸मृदंगाच्या व टाळांच्या तालावर केलेले सांघिक गायनसुध्दा शांतीच देते.
    आणि
    *केवळ* ह्या मंत्रगजराच्या शब्दांकडे पाहत राहणेसुध्दा शांतीच देते.

*(कथामंजिरी २-३०)*


श्रीराम...

*कथामंजिरी..... २ ( २५ )*

🙏

*कथामंजिरी..... २ ( २५ )*

रणकेदाररुद्र...
"कल्पनांच्या आधारानेच उचित तर्क करत व कुतर्क टाळत पुढे पुढे जावे लागते".

🔹 *ब्रह्मवादिनी अहल्येचे शब्द*..

▪️कल्पना सत्याला धरुन असेल,वास्तवाशी निगडित असेल आणि ज्ञानाधिष्ठित अर्थात *स्वानुभवाला* धरून असेल,तरच हितकारक ठरते. 
▪️ *कल्पना हेच मायेचे मूळ स्वरूप आहे*.
▪️कल्पनाच माणसाला बहकवते,कल्पनाच भय उत्पन्न करते,कल्पनाच आशा लावते,कल्पनाच अतृप्ती देते,कल्पनाच तुलना करते व मत्सर निर्माण करते.
▪️ *जेव्हा ही कल्पना सत्य आणि पावित्र्याशी जोडलेली असते तेव्हा हीच कल्पना अर्थात हीच माया मनुष्याचा अभ्युदय करणारी ठरते*.
🔸 *कल्पनाशक्ती त्याज्य अजिबात नाही परंतु पावित्र्याला सोडून असणारी कल्पना मात्र त्याज्य आहे*.

☘️☘️☘️

▪️कल्पनेला अर्थात जडमायेला अर्थात विकार व अडचणी उत्पन्न करणाऱ्या मायेला आटोक्यात आणू शकतो,तो फक्त *स्वयंभगवानच*..
▪ *मानवाचे हे कामच नव्हे*.

☘️☘️☘️

▪️ही जडमाया मनुष्याला कठपुतलीप्रमाणे खेळवत राहते.
▪️हिची सहा चाके - काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर.
▪️ह्या प्रत्येक चाकावर ही माया,प्रत्येक मनुष्याच्या *मनाला* मातीच्या गोळ्याप्रमाणे ठेवते व ही चक्रे यंत्रवत चालू करते आणि मग त्या मातीच्या गोळ्यांना ( मनाला ) विविध आकार देत राहते...मातीच्या गोळ्यांच्या हातात काय असते? तो बिचारा चक्राधीन आहे.यंत्रारूढ आहे.
*परंतु ही जडमायासुध्दा स्वयंभगवानाचीच एक शक्ती आहे*.*तिच्या ह्या खेळाला स्वयंभगवानाची संमती असतेच*.

🌿🌿🌿

*स्वयंभगवानाचा मंत्रगजर जो नियमाने करत राहतो ,त्याला जडमाया बाधत नाही व अविद्यामाया त्याला विद्यामायेच्या हातात सोपवते*.

🌿🌿🌿🌿

Tulsipatra 1516

हरि ओम.
तुलसीपत्र 1516 मधील हे माझ्या देवाचे  अनमोल उवाच .....
*तुम्ही सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात*..कारण.. भगवान त्रिविक्रमाचे रुप प्रत्यक्ष पाहणे हे फक्त सत्ययुगातच शक्य असते.तुम्हाला ते त्रेतायुगात प्राप्त झाले आहे. ह्यापुढील काळात 'श्रीराम 'रुपाने त्रिविक्रमाचे एक स्वरूप वसुंधरेवर चालेल, वावरून कार्य करेल.
नंतर व्दापारयुगात अशाच प्रकारे स्वंयंभगवानाचे 'श्रीकृष्ण 'रुप वसुंधरेवर लीला करेल. 
परंतु *श्रीराम व श्रीकृष्ण* ह्यांचे *मूळरुप ओळखणारे लोक तेव्हाही अगदी थोडेच असतील*. 
मात्र कलियुगाच्या अंतिम चरणाच्या सुरुवातीला *श्रीराम व श्रीकृष्ण* ह्याचे एकत्रित स्वरुप, एकरुप व संयुक्त भाव घेऊन स्वयंभगवान त्रिविक्रम श्रद्धावानांसमोर उकलून दाखविला जाईल त्याचे नाम, रुप व कार्य सर्व श्रद्धावानांना पाहता येईल. 
का 
कारण *कलियुगाचा अंतिम चरण'मत्स्य युग' हे नाम धारण करून सुरू झाल्यानंतर दोन पर्याय उरतील. 

१)जगातील अनाचार अधिकाधिक वाढतच गेला व भक्ती क्षीण झाली, तर मग फक्त अडीच हजार वर्षेच उरतील व त्यानंतर प्रलय होईल आणि प्रलयानंतर परत सर्व अभक्त मानव पुन्हा प्राणियोनीत जन्म घेऊन ८४लक्ष योनीचा प्रवास करीत करीत अर्थात सतत दु:खे भोगत भोगत पुन्हा मानव बनतील. 
आणि तेसुद्धा आधील युगातील आपापली पापे बरोबर घेऊनच -अर्थात अशा अभक्तांना त्या नवीन कल्पात सत्ययुग, त्रेतायुग व व्दापारयुगात जन्मच मिळणार नाही - थेट काळ्या कलियुगात मानव म्हणून प्रवेश मिळेल. 

२)परंतु भगवान त्रिविक्रमाला असे व्हावयास नको आहे 
आपल्या भक्तांना तरी अधिक चांगली संधी मिळावी,असे त्याला मनोमन वाटते आणि म्हणून त्याने  जगदंबेची तपश्चर्या करून हा दुसरा पर्याय तयार केला आहे. 
हा दुसरा पर्याय म्हणजे जे जे कुणी हातून चुका घडत असताना सुद्धा,दु:खात व सुखातही स्वयंभगवान त्रिविक्रमाचा मंत्रगजर करत राहतील,त्यांच्यावर अत्यंत प्रेम करतील, त्याच्या चरणांशी घट्ट बांधून घेतली आणि त्यांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा अधिकाधिक प्रयास करतील, त्यांना आणि फक्त केवळ त्यांना भगवान त्रिविक्रम त्या प्रलयातून  स्वतः वाचवेल - ह्यासाठी संनिहिताच नौका बनेल.
बाकीचे सर्व प्रलयात नष्ट होतील. परंतु निसर्ग नष्ट होणार नाही आणि त्रिविक्रमाचे भक्त थेट कलियुगाच्याच पुढील भागात प्रवेश करतील व तो भाग अडीच लाख वर्षे इतका असेल 
आणि त्या अडीच लाख वर्षामध्ये ह्या प्रलयातून वाचलेल्या त्रिविक्रमभक्तांना त्यांची गतजन्मातील सर्व पापे माफ केलेली असतील आणि त्यामुळे ते   सर्वजण पुढील प्रत्येक जन्मात अत्यंत सुखाने, आनंद करीत, एकही रोग न होता, एकही संकट न येता फक्त यश आणि यशच मिळवत राहतील आणि मग महाप्रलयानंतर स्वयंभगवानाच्या साकेतलोकामध्ये आणि अर्थात भर्गलोकामध्येही सुखाने कालक्रमण करतील. -त्यांना त्यानंतरच्या युगामध्ये फक्त प्रारब्धहीन जन्म मिळेल अर्थात भगवंताच्या इच्छेने.. भगवंताच्या लीलेत निकटचे सहकारी बनण्यासाठी व इतरांना सन्मार्गावर आणण्यासाठी... 
आणि हा *दुसरा पर्यायच* आपल्या भक्तांना मिळावा ह्यासाठीच त्रिविक्रम कलियुगाच्या मत्स्ययुगापर्यत स्वतःचे स्वरुप कलियुगात झाकून ठेवील आणि *मागील जन्मांमध्ये ज्याने त्रिविक्रमाची भक्ती केली आहे,* त्यांना स्वतःकडे आकर्षित करुन घेईल आणि त्यांच्याकडून हा *मंत्रगजर करवून* घेईल. 

*लक्षात ठेवा*! त्याच्या इच्छेविरुद्ध काहीही घडू शकत नाही -पापही आणि पुण्यही. (तुलसी पत्र १५१६)

Tulsipatra 1544

*तुलसीपत्र १५४४*
                  देवर्षि म्हणाले ,"हे शुभदे ! स्वयंभगवान त्रिविक्रमाने स्वतःच *'अर्चन-अवतार'* अगदी सत्ययुगापासून संपूर्ण चण्डिकाकुलासाठीच ब्रह्मर्षिसभेमध्येच मान्य केलेला आहे, स्वीकारलेला आहे."
                शुभदेने विचारले , "म्हणजे नक्की काय ?" 
                देवर्षि नारद म्हणाले ," ह्याचा अर्थ एकच की स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाने सगुण साकार पूजा अर्थात स्थूल प्रतिमेचे पूजन अर्थात *पूजासेवा ,अर्चनसेवा* *१०८% स्वीकारलेली आहे.*
                   व स्वतःच्या सच्च्या भक्ताकडील स्वतःच्या तसबिरीला, पूजल्या जाणाऱ्या चित्राला आणि मूर्तीला त्याने स्वतःचा *'अवतार'* म्हणून मान्यता दिली आहे."
                   शुभदा आनंदाने नाचू गाऊ लागली, "अहाहा ! काय *अपरंपार कोमल हृदय आहे ह्या भगवंताचे ! स्वतःच्या मूर्तीलाही 'अर्चन अवतार' म्हणून सिद्ध केले आहे.*"
                    देवर्षि नारद म्हणाले, "खरे आहे ! आणि म्हणूनच *आपल्याकडील आपल्या इष्टदैवताची मूर्ती _हा स्वतः त्रिविक्रमानेच_ सिद्ध केलेला अवतार आहे*, हे जाणून त्रिविक्रमाच्या मूर्तीचे भरभरून पूजन करीत राहावे. 
                  हे असे स्थूल उपचार करत असताना *भावना मात्र हीच असावी की _ही मूर्ती_ जिवंत आहे.* 
                  आपल्या तसबिरीला व मूर्तीला 'अवतार' म्हणून सिद्ध करताना *त्रिविक्रमाने* मला स्पष्ट सांगितले होते की - *'जेव्हा माझा सच्चा भक्त माझ्या प्रतिमेचे मनोभावे पूजन करतो तेव्हा त्या वेळेपुरता मी संपूर्णपणे त्या भक्तावर अवलंबून राहतो ,जसे एखादे बालक आपल्या पालकांवर अवलंबून असते तसे.* 
                  अर्थात पूजनाच्या वेळीपुरता मी पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असतो आणि त्याच्याकडून स्वतःचे कौतुक करून घेतो. मात्र त्याची भक्ती ज्या प्रमाणात खरी, त्याच्या दसपट ,पूजनाच्या वेळेस मी माझे मूळ स्वरूप त्याच्या हृदयात खेळवत राहतो.
                   *मला माझ्या मंत्रगजराने केलेले प्रासादिक पूजन आणि विधिवत उपचार केलेले शास्त्रोक्त पूजन समानपणे प्रिय आहे.'*
                      शुभदे ! वरील वचने त्रिविक्रमाची आहेत, माझी नाहीत, ह्या नारदाची नाहीत ,हे लक्षात घे."

*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

Swayambhagwan and mantragajar

अहल्या, नतमस्तक होत म्हणाली,
"अगदी मनापासुन मी प्रत्येकाला सांगत राहते, की 
स्वयंभगवानाचा चरणस्पर्श
स्वयंभगवानाच्या रूपाचे चिंतन व
स्वयंभगवानाचा मंत्रगजर
हिच प्रत्येक श्रध्दावानासाठी *तीन* सर्वोत्कृष्ट साधने आहेत! 
जे जे म्हणुन खराब झाले आहे, चुकिचे झाले आहे, मूढ झाले आहे, धर्मविरुध्द झाले आहे, घातक झाले आहे, विषारी झाले आहे; ते ते दुरुस्त करण्यासाठी!
*कथामंजिरी २ - ११*
रविवार २५ डिसेंबर २०२२"

tulsipatra 1616

तुलसीपत्र १६१६ 

कलियुगात भक्तीभाव चैतन्यात राहाण्याची, मंत्रगजर करण्याची गरज का आहे?

भरत - शुभदा संवाद 
भरत - हे भक्तिरसमयी शुभदे!
हा स्वयंभगवान आकाशरुपाने सर्वत्र आणि सदैव व्यापून राहिलेला असतो.

सत्ययुगात या स्वयंभगवानाच्या ह्या आकाश रुपातून अर्थात आकाशातूनच प्रत्येक श्रद्धावानाला सहजतेने ऊर्जा व सहाय्य मिळविता येते.

त्रेतायुगात पवित्र यज्ञातून निघणा-या धुरातून ह्या यज्ञ स्वरुप स्वयंभगवानाचे सहाय्य श्रद्धावानांना सहजतेने मिळू लागते.

द्वापायुगात ह्या स्वयंभगवानाच्या पूजनातून अर्थात स्वयंभगवानाच्या विविध रुपांच्या प्राणप्रतिष्ठित मूर्तींपासून हेच सहाय्य श्रद्धावानांना मिळविता येते.

परंतु कलियुगामध्ये एका बाजूला भक्ती करण्याचा वेळ कमी कमी होत जातो, भक्तीची गोडीही कमी होत जाते, मंदिराचे पावित्र्य देखील सामान्यजन व मंदिरसेवकही व्यवस्थित पाळू शकत नाहीत, अन्न व नैवेद्यही तेवढेसे शुद्ध नसतात, मंदिराच्या आजूबाजूला फक्त नफा कमावणा-यांचेच अस्तित्व वाढू लागते आणि दुस-या बाजूला तपश्चर्या, कठोर व्रते, ध्यान धारणा, पवित्र आचरण, समर्पण बुद्धी या घटकांचा लोप होत जातो व त्याचबरोबर अनैतिकता, पापे, दुराचार वाढू लागतात.

ह्यामुळे साध्यासुध्या मनुष्याला स्वयंभगवानापासून सहाय्य मिळविण्याचे सर्व मार्ग वापरता येत नाहीत व हे नीट जाणणारा स्वयंभगवान आपल्या अपत्यांवरील प्रेमामुळे धुलिकणपुरुष व स्त्रिया उत्पन्न करीत राहतो.
हे सर्व धुलिकणपुरुष व स्त्रिया भक्ती करु पाहाणा-या मानवांच्या त्रिविध देहांमध्ये स्वयंभगवानाचे सहाय्य स्वतः आणून थेट ओतत राहतात. श्रद्धावानाला काही करावेच लागत नाही.
सहाय्य करणा-या या धुलिकणपुरुषांना श्रद्धावानाच्या त्रिविध देहांत सहाय्य ओतण्यासाठी कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नसते.
परंतु या सहाय्याचा उपयोग करून घेण्यासाठी श्रद्धावानाला मात्र भक्तीभाव चैतन्यात राहण्याची आवश्यकता असते.
जो जो श्रद्धावान भक्तीभाव चैतन्यात राहतो, त्याच्या त्रिविध देहांत स्वयंभगवानाच्या सर्व प्रकारच्या ऊर्जा, ह्या अशा धुलिकणपुरुषांच्या माध्यमातून विविध कार्ये करु लागतात.
पृथ्वीवरील प्रत्येक धुलिकणाला सुद्धा हा स्वयंभगवान आपला दूत बनवू शकतो अर्थात धुलिकणपुरुष बनवू शकतो - केवळ त्याच्या चरणस्पर्शाने.

स्वयंभगवानाचे चरण धरणे, त्यांच्यावर आपले मस्तक टेकविणे, त्याच्या चरणांवर स्वत:ला समर्पित करणे, त्या चरणांची सेवा करणे आणि त्या चरणांना आपल्या हृदयात बसविणे हेच सर्व श्रद्धावानांसाठी सर्वश्रेष्ठ आहे.

या स्वयंभगवानाचे चरण आपण प्रेमाने पकडले तर आपल्या ह्या भौतिक स्थूल शरीरात सुद्धा आपोआपच असंख्य धूलिकणपुरुष तयार होतील. 
ही स्वयंभगवानाचीच योजना आहे त्याच्यावर निस्सीम प्रेम करणा-या श्रद्धावानांसाठी.

श्रद्धावानाला, हा स्वयंभगवान कधी आपल्यासाठी, आपल्याला सहाय्य करण्यासाठी असे तेजस्वी धूलिकणपुरुष उत्पन्न करील ह्याची वाट पाहण्याची  गरज उरणार नाही. आपणच जर त्याचे चरण पकडले  की मग वाट पाहणे थांबते.

भरत - श्रद्धावानहो! तो स्वयंभगवान कधी तुमच्या जीवनात पाय ठेवील याची वाट पाहत बसू नका, उठा! आणि त्याचे चरण आपल्या मस्तकावर, हातात आणि प्रेमाने हृदयात धारण करा. त्याचे कार्य तो करतच असतो आपण आपले कार्य करुया.

आणि आपले प्रमुख कार्य आहे त्याच्या दोन चरणांत राहण्याचे.

आणि त्याच्या दोन चरणांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भक्तीभाव चैतन्य.
आणि त्याच्या भक्तीभाव चैतन्यात राहाण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे मंत्रगजर.
रामनाम, रामकथा हे भक्तीभाव चैतन्याचे महाद्वार आहे.

From whatsapp

Sparrow importance

हरि ॐ, आज २० मार्च २०२३ म्हणजेच जागतिक चिमणी दिन, आज आपण जाणुन घेऊ चिंमणीबद्दल.

सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापुंनी सांगितले आहे की,चिमणी हा पक्षी मनाला शांती देणारा आहे, व स्वयंभगवान त्रिविक्रमाचा आवडता पक्षी आहे.चिमण्यांची संख्या कमी होत असतानाच स्वयंभगवान त्रिविक्रम पृथ्वीवर अवतरेल. चिमण्यांचे संवर्धन करणे ,त्याची संख्या वाढवणे हे देखील भक्तीभाव चैतन्य आहे. स्वयंभगवानचा मंत्रगजर करणारा भक्त कधीच मनुष्ययोनीतुन प्राणीयोनीत जात नाही अणि ह्या कार्यासाठी त्रिविक्रमाने चिमणी हा पक्षी प्रेमाने निवडला आहे, कारण चिमणी ह्या पक्ष्याचे निसर्गातील जीवशृंखलेतील कार्यच मुळी शुभ स्पंदने  व आरोग्यस्पंदने वाढविण्याचेच आहे अणि ही जी चिमणी तुम्हाला मदतकर्ती झाली, ती स्वयंभगवान ने स्वत: तयार केलेली चिमणी योनीतील सत्ययुगातील पहिली चिमणी आहे - ही अजर आहे अणि अमर आहे अणि स्वयंभगवानची दुत आहे. चिमणी ही निव्वळ पक्षीयोनी नव्हे, चिमणी ही गंधर्व, यक्ष, विद्याधर ह्यांच्याप्रमाणेच एक वेगळीच, खास कार्यासाठी निर्माण झालेली दैवीयोनी आहे.

त्यामुळे  जो जो श्रध्दावान वाट चुकुन काही भलत्याच चुका करुन बसतो, परंतु भानावर येताच  मनमोकळे पणाने स्वयंभगवानकडे क्षमायाचना करतो अणि श्रद्धापूर्वक जीवन जगु लागतो, अशा श्रध्दावानाला हा स्वयंभगवान त्रिविक्रम पुढील जन्म चिमणी वंशात देतो.ह्यामुळे तो वाट चुकुन पापी बनलेला श्रध्दावान  चिमणी रुपात इतर श्रध्दावानांसाठी शुभ कार्ये करीत करीत संपुर्ण पापमुक्त होतो. मात्र ही संधी, स्वतःची चुक पुर्णपणे मान्य असलेल्या खरेखुरे श्रध्दावानाला मिळते; म्हणुन चिमणी ह्या पक्ष्याचे घात करणे ,हे गोहत्येनंतरचे दुसरे पातक आहे. श्रध्दावानांनी प्रत्येक चिमणी ही श्रेष्ठ श्रध्दावानच आहे, हे जाणुन तिचा आदर करायचा असतो."

म्हणुन घराच्या परसात थोडेसे धान्य व पाणी नियमित ठेवा, चिमण्यांसाठी कृत्रिम घरटे बनवा.

*॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ ॥नाथसंविध॥*

Mantra jagar importance -2

*आपण आपल्या जीवनातही चुकीच्या कल्पना, चुकीच्या अपेक्षा ठेवतो आणि छद्म आत्म्यास जन्म देतो.  आपल्या चुकीच्या कल्पना चुकीच्या अपेक्षा म्हणजेच "छद्म आत्मा "*.

      वजन काट्याचे उदाहरण ही एक मजा होती. तुम्हांला कळावे म्हणून. आपण स्वतः कडून देखील चुकीच्या अपेक्षा ठेवतो. आपला सभोवतालचा परिसर, माणसे, राष्ट्रे यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि त्यामुळे *आपले मनच आपले शत्रू होते*. हे मनच माझ्या व माझ्या परमेश्वराच्या आड येते.  त्यामुळेच आत्म्याला जगदंबा व स्वयंभगवानाकडून प्राप्त झालेल्या गोष्टी मला प्राप्त होऊ शकत नाहीत. 

       आपल्याला शरीर आहे हे अमान्य करता येत नाही.  आपल्यात *जनुके* आहेत.  त्यामुळेच पौगंडावस्थेत मुले व मुली एकमेकांकडे आकर्षित होतात.  जनुकांमुळेच मला भूक लागते.  भूक लागणे ही काही वाईट गोष्ट नाही.  कोणाला दोनदा तर कोणाला पाच वेळा भूक लागते. यात विशेष असे काही नाही. 

      *माझे पूण॔ जीवन नक्कीच माझ्या शरीरावर अवलंबून असते.  म्हणूनच मला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  शरीराकडे दुल॔क्ष केल्यास मी आध्यात्मिक ध्यास घेऊ शकत नाही.  म्हणूनच स्वतःच्या शरीराची उत्तम रितीने काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे*.

      आपण आपल्या शरीराकडून आणि मनाकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो.   खरं तर त्यांची व इतर गोष्टींची सरमिसळ करतो.  *चुकीच्या अपेक्षा म्हणजेच छद्म आत्मा    सर्व गोष्टींच्या आड येतो. छद्म आत्मा सर्वात मोठा अडथळा आहे*.  हनुमन्त मुळात वधस्तंभावर आहे या छद्म आत्म्याला मारण्यासाठी.  कसा? तर थोडा थोडा, हळूहळू आणि सतत.  त्यामुळे आपल्याला दु:ख जाणवत नाही.  दु:खदायक परिस्थितीतून बाहेर न येता जर आपल्याला छद्म आत्म्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर *मंत्रगजर हा एकमेव राजमार्ग आहे*.

     हनुमान चलिसामुळे महाप्राणाकडून येणारी विश्वाची प्राणशक्ती आपल्याला प्राप्त होते.   हिच प्राणशक्ती प्रत्येक ग्रहाला त्याच्या कक्षेत फिरण्याची शक्ती देते.  *तोच महाप्राण तिच प्राणशक्ती आपल्यात सुद्धा आहे.   आपल्या नाथसंविधानुसार महाप्राण व प्राणशक्ती आपल्या आयुष्यात काय॔रत राहतात*.

      मंत्रगजर 1 माळ, 16, 32 किंवा 108 माळा तुम्हांला पाहिजे तेवढया करा.  या माळा पहिल्यांदा आपल्याला तयार करतात.  त्यामुळेच आपण जगदंबा व तिच्या पुत्राला आपले मन व शरीर तयार करण्याकरिता आमंत्रित करतो.

      मंत्रगजर चार पातळयांवर काम करतो.

👉   प्रथम शरीर व मन तयार करणे.

👉   परमेश्वराकडून शक्ती व मदत ग्रहण करण्याची क्षमता वाढवितो.

👉    प्राप्त झालेली क्षमता कधी, कुठे व कशी वापरायची व त्यातून यश कसे प्राप्त करायचे हे शिकवते.

👉   चुकीच्या गोष्टी करण्यास परावृत्त करते.  आपण सिंहावलोकन केल्यावर मी हे करायला नको होते. माझ्याकडून चूक घडली. ही अपराधीपणाची भावना येते.  *नित्य म॓त्रगजर व वर्षातून एकदा एका  दिवसात 108 वेळा म्हटलेली हनुमान चलिसा माझ्या मनातील सर्व अपराध दूर करतात*. हनुमाना चलिसा माझ्यातील महाप्राण जो निष्क्रीय झाला आहे त्याला सक्रीय करते. *म्हणजेच मन, प्राण, प्रज्ञा एकात्मतेने काय॔ करु लागतात*.

      लहान मुलांना मी कमीत कमी तीन वेळा हनुमान चलिसा म्हणायला सांगतो. कारण त्यांचा लहान मेंदू विकसित होत असतो.  छोट्या मुलांना बरेच प्रश्न पडलेले असतात. त्यांची उत्तरे कोणीच देत नाही.   *ती नेहमी गोंधळलेली असली तरी नेहमी आनंदी असतात*. हिच योग्य वेळ आहे जेव्हा त्यांचे मन तयार होते.  म्हणजे छद्म आत्मा तयार होणार नाही व परमेश्वराकडून बक्षीस रुपात प्राप्त होणा-या चांगल्या गोष्टी त्याच्या व्यक्तीमत्वाचा विकास घडवून आणतील.  *म्हणूनच माझ्या बाळांनी हनुमान चलिसा रोज तीन वेळा म्हटलीच पाहिजे*.  तुम्ही 70 वर्षाचे असा की 80 तुम्ही माझी बाळेच आहात.

      गुरुचरणमासामध्ये 108 वेळा हनुमान चलिसा म्हणा.  जसे जमेल तसे म्हणा पण म्हणा.

      *माझ्या व माझ्या यशस्वी जीवनाच्या आड ज्या गोष्टी येतात त्या बाजूला होतील. हेच हनुमान चलिसाचे महत्त्व आहे*. 

      हनुमान चलिसात 108 मंत्र आहेत.  किती? 108. 108 मंत्र 108 वेळा म्हटले जातात.  अनेक मंत्र तुम्ही स्वत:च सहजपणे ओळखू शकता.  

नासै रोग हरे सब पीरा  ।
जपत निरंतर हनुमत बीरा ॥

होत न आज्ञा बिनु पैसारे ।

      *पैसारे म्हणजे प्रयास.  अवधी भाषेत पयसा म्हणजे प्रयास.   "असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी" हे होणे नाही.  प्रयास करा पण गधा मजूरी नको*.

       प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यपू वाईट वागवतात तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच वागत होता.  हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले, विष दिले तरी देवाने त्याला मरु दिले नाही व खांबात स्वत: प्रगटून हिरण्यकश्यपूचा वध केला. *कारण तो सतत मंत्रगजर करत होता*.

दै.प्रत्यक्ष अग्रलेख,Geopolitics व महाभारत.

हरि ओम

दै.प्रत्यक्ष अग्रलेख,Geopolitics व महाभारत.

खरो खरचं ह्या गुरुवारचे दिं .17/8/2023 रोजीचे पितृवचन खुपचं सुंदर होते.बापूंनी मनातले बोलुन दाखवले.आपण  सर्व बापू आहेत सांगून मोकळे होतो ,सर्व कार्य,जबाबदाऱ्या फक्त बापूंची, असे म्हणत निष्क्रिय होत चाललो ,तसेच सोयीनुसार comfort zone मध्ये जात चाललो .विश्वास जरूर असावा पण खाली दिलेले अग्रलेख जेव्हा आपण वाचतो तेव्हा प्रामुख्याने  जाणवेल की राज घरान्यातील  संपूर्ण परिवार,प्रधान,सेवक.... ई स्वयंभवान्याच्या कार्यात रात्रं दिवस एककरून मंत्रगजर करत पुढे जातात.
 
आपण जर दैनिक प्रत्यक्ष मधील अग्रलेख *वासुंधरेचा इतिहास* पासून सुरुवात केली तर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवेल की सर्व मंडळी confort  zone  मधून बाहेर येऊन अचूक आखणी करून कार्य करतात.
*वेदामध्ये भक्ती हा शब्द नाही , पण उपनिषधामध्ये आहे* मग मधल्या काळात असे काय घडले की देवाने भक्ती दिली..मग ही कथा आहे सत्य युगाच्या 50,000 वर्षा नंतरची.


महामाता सतोरिया ही राणी,पतीचा घात झाला .सोन्याच्या शोधात निबुरा ग्रहा वरून हयवांनियस यानातून राजा zeus , पत्नी बिजोयमाला असे अनेक जण आफ्रिकेच्या जंगलात उतरून कार्य करू लागले.यात राज परिवार आई दुर्गा v पुत्र त्रिविकमाचे उपासक.मात्र साटाडोरीना(सर्की )सारखे अनेक राजघराण्यातील व्यक्ती शुक्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली असुरी पंथाचे उपासक होते.यात *शुक्राचार्य यांच्या कन्या दनु,कद्रू, nysx, व  सुंदर अशी लीलिथ (जी उलट्या विश्वात पंडोर v पांडोरा म्हणून आज देखील जिवंत आहे v कल्युगाच्या मध्यात त्रिविक्राच्या हातून वध निश्चित आहे)* active participants होत्या. कद्रू ही reptile म्हणजे मगरीचे रुप घेत असे कधी ती चीन मध्ये dragon च्या रुपात कार्य करताना दिसते.या मंडळींनी  grey aliens ची फौज ही निर्माण केली.नॅक्स हीनी युध्दासाठी dinosours ची निर्मिती केली.pyramids ची निर्मिती सोने द्रव्य रूपाने त्या मध्ये रासायनिक प्रयोग शाळेतून हैवांनियस यान मार्फत निबुरा ग्रहावर पाठवीत असे.तसेच barmuda triangle 📐 येथे समुद्रात प्रचंड आकाराचे स्पटिकाच्या pyramid ची निर्मिती करून त्यात अनु शक्ती रासायनिक प्रयोग शाळेचे अस्तित्व,.ह्या pyramid साह्याने ही मंडळी 3rd dimension द्वारे काही घटकात थेट ड्रॅगन ग्रहावर जात असे.nile ह्या नदीची उलट्या प्रहावाने निर्मिती केली.व *महंत्त्वाचे म्हणजे त्या वेळेस महिषासुराने सॉलोमनच्य* देहात प्रवेश करून कार्य करू लागला.मात्र त्रिविकमाची बहीण *Aphrodite* (aphra.जे पवित्र नाव आपल्या milk products चे आहे)
या मंडळी विरुद्ध महा माता सतोरियाने युद्ध छेडले.यात Hercules,demater असे अनेक जण रात्र दिवस वेगवेगळे कार्य करत होते.कधी योगायोगाने एकत्र आले की आप्तांना भेटून क्षणभर अश्रू गाळून पण दिलेल्या कार्यचे गांभीर्य ओळून पुन्हा आखणी करून पुढील कार्य करायचे.
मात्र विस्मरणीय क्षण म्हणजे जी माता सतोरीया पडद्या मागून कार्य करत होती ,ती शर रूपाने (वाळू)असलेले सेरा जिने शुक्रचाऱ्याचा सहायाने माता सतोरियाच्या पतीचा वध केला होता .ती सेराचा वध करण्यासाी स्वतः deryanku गुफेत जाण्यासाठी निघाली.वृद्ध डमेटर  यान चालक होता.विशिष्ट पद्धतीने विमान वर्तुळ आकाराने घिरट्या घालून माता सातोरिया deryanku गुफे समोर उतरली.या गुफेत फक्त अपवित्र  कुविद्या धारक जाऊ शकत होते.तिने स्वतःचे मास काळचे रक्त केस मोकळे सोडून सर्वांगाला लावले व कुमंत्र म्हणत गुफेत शिरली. सेर v तिचे युद्ध झाले .सेर चा वध करून ती कोसळणार प्रत्यक्ष त्रिविक्रमाने तीला आपल्या दोन्ही हातात घेऊन गूफेतून बाहेर आणले.
पुढे Hercules v Aphrodite एकत्र कार्य करून या कुविद्या धारक v Solomon चा वध केला.तसेच महामस्तिष ह्या सुपर computer चे तुकडे करून विविध ठिकाणी जमिनीत पुरले.आज देखील ही मंडळी त्याचे रक्षण करीत आहे.

या पासून आपल्या एक निश्चित लक्षात येते की या मंडळींनी जर रात्र दिवस  एक करून कार्य केले नसते तर काय परिसथिती निर्माण झाली असती.
स्वतःला fit राखा.,तसेच आपल्या देशात व विश्व काय चालले याचाही दै.प्रत्यक्ष वाचून update राहू या.आता सुरू असलेली कथामंजेरीही अद्भुत आहे.गोदावरी देवी,वत्सला मावशी,ही सर्व मंडळी कुठल्या न कुठल्या शास्त्रात एक्स्पर्ट आहेत.science चे भरपूर knowledge आहे.तसेच शुर देखील आहेत.देशमुखच्या वाड्यात असो की बाहेर असो मंत्र्गजर  म्हणत ब्रह्ममुहतला सभा सुरू होत असत.कितीही संकट येवो मंत्रगजर म्हणत पुढे जायचे. जीवाची पर्वा न करता तहान,भूक विसरून अचूक नियोजन करून रात्र दिवस फक्त भगवान त्रिक्रमाचे कार्य करने हेच ध्येय..

mantargajar importance

॥ हरि: ॐ॥

*मन्त्रगजर महत्त्व*
दैनिक प्रत्यक्ष अग्रलेख *तुलसीपत्र क्र. १५७७* मध्ये स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाच्या भक्तिभाव चैतन्याचे सविस्तर विवेचन *सद्गुरु श्री अनिरुद्धांनी* केले आहे. या अग्रलेखात बापू सांगतात-
*‘भक्तिभाव चैतन्यामध्ये स्वयंभगवानाचा मंत्रगजर हा सर्वोच्च मंत्र मानला जातो* कारण हा दत्तभगिनी शुभात्रेयीने केला आहे.
ह्या मंत्रगजरातून भक्तिभाव चैतन्याच्या लहरी उसळत राहतात आणि *ज्याला ज्याला म्हणून स्वतःचे जीवन चांगले घडवायचे आहे, त्याला सर्व काही पुरविले जाते*.
मला प्रत्यक्ष माता शुभात्रेयीने सांगितले आहे की जो श्रद्धावान ह्या मंत्रगजराच्या 16 माळा दररोज, ह्याप्रमाणे कमीतकमी 3 वर्षे करतो, त्या श्रद्धावानाच्या विशुद्ध चक्राच्या (कंठकूप चक्राच्या) सोळाच्या सोळा पाकळ्या शुद्ध होतात अर्थात त्याचे विशुद्ध चक्र हनुमत्-चक्र बनते. मग कुठल्याही जन्मात तो सुखाने येतो, आनंदात राहतो आणि आनंदातच विलीन होतो.
स्वयंभगवानाचा स्पर्श ज्याला झाला, ती वस्तू, पदार्थ, व्यक्ती आपोआप पवित्र होते व ह्याला अपवाद नाही.
हा *स्वयंभगवान प्रेमळ व कृपाळू आहे, हा ठाम विश्‍वास बाळगूनच जप करा, ह्याच्या प्रतिमेचे पूजन करा, ह्याच्या पादुकांचे अर्चन करा, ह्याच्या चरणांकडे पाहत रहा, ह्याच्या मुखाकडे पाहत ह्याचे सौंदर्य पीत रहा, ह्याच्या मूर्तीला अर्थात अर्चनविग्रहाला ‘जिवंत देव’ जाणून सर्व प्रकारे सेवा करा आणि केवळ ह्याला आवडते म्हणून खर्‍याखुर्‍या गरजू श्रद्धावानांना सहाय्य करा, हेही भक्तिभाव चैतन्यच*.’
त्याचप्रमाणे *तुलसीपत्र 1588* या अग्रलेखात बापू आम्हाला सांगतात - *‘स्वतःच्या जीवनशेतीचा मी फक्त शेतकरी आहे आणि हा स्वयंभगवानच मालक आहे’ हे मनावर नीट बिंबवून मंत्रगजराच्या माळा करीत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य*.  

bhagvati sannihita: agralekh 1514 and 1515

👆👆👆

*भगवती सन्निहिता*...

अग्रलेख  १५१४ / १५१५ मधे बापुंनी जे विस्तृतपणे दिले आहे ते खालीलप्रमाणे....👇

*हा संवाद  'देवर्षि नारद व शुभदा' ह्यांच्यातील आहे*...

🌺 सन्निहिता म्हणजे प्रत्येक श्रध्दावानाच्या सर्वात निकट असणारी, त्याच्याबरोबर सदैव असणारी, 'भक्ताच्या जीवनात ती त्याच्यासाठी उपलब्ध नाही' असे कधीच नसणारी अशी,,,,,, स्वयंभगवान त्रिविक्रमानेच आपल्या भक्तांच्या *अभ्युदयासाठी* त्याच्या चहुबाजूंना ठेवलेली *स्वतःकडील प्रेमभक्ती*.
आणि 
ही स्वयंभगवान त्रिविक्रमाची *त्रि-नाथांवरील भक्ती*
आणि
त्याचे त्याच्या *भक्तांवरील प्रेम*
ह्याचे *एकरूप* स्वरूप असणारी, अशी ही सन्निहिता म्हणजेच,,,,
*स्वयंभगवान त्रिविक्रमाची  निजशक्ती,निजमाया,आत्ममाया,प्रेममाया,प्रसादमाया ( वात्सल्यमाया ) अर्थात त्याच्याशी अभेदाने राहणारी त्याची भक्तियोगमाया*.

🌺 ही स्वयंभगवानाची भक्तियोगमाया सन्निहिता हीच त्याची वामांगिनी.*हिला भौतिक  स्वरूप नाही*

🌺 सामान्य मनुष्याला छळणा-या मायेला ही सन्निहिताच ख-या भक्ताच्या जीवनातून दूर पळवते.

🌺 ह्या सन्निहितेचे दुरुन दर्शन झाले तरी *सर्वांची त्रेधातिरपीट उडवणारी मोहमाया,जीव घेऊन पळत सुटते*.

🌺 *श्रेष्ठ भक्ताच्या नसेनसेतून,रक्ताच्या प्रत्येक थेंबातून,शरीरातील प्रत्येक पेशीतून,मनाच्या प्रत्येक अवस्थेतून आणि प्राणाच्या प्रत्येक स्पंदनातून....शुध्द भक्ती निरंतर वाहत ठेवणे....हेच सन्निहितेचे कार्य आहे*.

🌺🌺 

*भगवती सन्निहितेची प्रत्येक ख-या भक्तासाठी ' ५ ' स्वरूपे आहेत*.

🔹 स्वयंभगवानाचे नामस्मरण सतत करीत राहणे -- *नामभक्ती*.

🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या रूपाकडे अत्यंत प्रेमाने पाहत पाहत ,त्याच्या चरणांवर दृष्टी खिळवून ठेवणे -- *दर्शनभक्ती*

🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंदिराची प्रत्येक सेवा आणि कुठलीही सेवा अत्यंत प्रेमाने,मनापासून,वारंवार करीत राहणे -- *सेवाभक्ती*

🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या गुणांचे,अनुभवांचे आणि कथांचे प्रेमपूर्वक श्रवण आणि कीर्तन करणे -- *आचरणभक्ती*

🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाचा 'मंत्रगजर' ...दिवसा-रात्री ,सुखात-दुःखात ,काम करत असताना-आराम करीत असताना ,प्रफुल्लित-उदास असताना ,त्रिविक्रमाची तसबीर समोर असताना-नसताना ,यश-अपयश ह्यांना सामोरे जाताना ,त्रिविक्रमावर खूष असताना - त्रिविक्रमावर रुसलेले असताना.........अशा कुठल्याही अवस्थेमध्ये आत्यंतिक भावाने करीत राहणे -- *आनंदभक्ती*

🌺🌺

🔹ही सन्निहिता *भावरूपिणी* आहे--अर्थात तिची मूर्ती नाही,आकृतीही नाही,चित्रही नाही आणि *नसावे*....
*कारण एकच*
👇
*ती त्रिविक्रमापासून अभिन्न आहे म्हणून....*

एकदा का मूर्ती तयार झाली किंवा चित्र रेखाटले गेले की सामान्य भक्ताच्या मनात 'भेद' उत्पन्न  होतोच आणि मग तो त्रिविक्रमाची भक्ती पूर्णभावाने करू शकत नाही आणि 'हे नाथसंविध् नाही'...

🔹 किंबहुना स्वयंभगवान त्रिविक्रम कार्यासाठी स्वतःच 'सन्निहिता' बनतो...तोही पूर्ण आणि तीही पूर्ण...आणि कार्य संपन्न होताच परत आपले 'सन्निहिता' स्वरूप आपल्या मूळ रूपात खेचून घेतो.

🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाचे 'सन्निहिता'  स्वरूप त्याच्यावर अवलंबून असूनसुध्दा सर्वदृष्ट्या स्वतंत्रही असते.कारण *ही भावरूपा असल्यामुळे ,हिच्यात कुठलाच अभाव असूच शकत नाही*.

🔹 *प्रत्येक  सच्चा भक्त त्रिविक्रमाशी सन्निहित व्हावा म्हणूनच ''''' त्रिविक्रमाची मूर्ती हिच सन्निहितेची मूर्ती'''''*.

🔹 ज्ञानी व योगी  भगवती सन्निहितेला *स्वामिनी* ह्या नावाने साद घालत असतात.

🌺🌺🌺🌺🌺

*भगवान त्रिविक्रम 'सन्निहिता' बनतो ,ते केवळ आपल्या भक्तांना भ्रममायेच्या जाळ्यातून सोडवण्यासाठीच*.....

ही भ्रममाया अर्थात मोहमायासुध्दा भगवंताचीच एक शक्ती आहे ---
१) अभक्तांना नियमांच्या प्रांतात अर्थात कर्मफळाच्या तुरुंगात बंदिस्त करण्यासाठी.
🌺

*जो सच्चा भक्त , 'कर्ता-करविता एकमेव स्वयंभगवान त्रिविक्रम आहे'  असा दृढविश्वास धरून त्याच्यावर प्रेम करतो , त्याच्यासाठी त्रिविक्रम 'सन्निहिता' बनून ....*

🔹 त्या भक्ताच्या पापांना भस्म करुन टाकतो व केवळ *चुका* म्हणून समजतो.
🔹चुका सुधारण्याची संधी देतो....त्यांची भक्ती अधिक वाढवून.



🙏

श्रीराम.
अंबज्ञ.
नाथसंविध्.

Thursday, November 16, 2023

hanuman chalisa pravachan

प.पू. बापूंनी दिनांक 20/06/2019 रोजी केलेल्या इंग्रजी पितृवचनाचा प.पू. बापूंच्या आशीर्वादाने केलेला मराठी अनुवाद. 

     मित्रांनो आज आपण कशावर बोलणार?

     हनुमान चलिसाबद्दल बोलू.

     हनुमान चलिसा नक्की काय आहे? आम्ही *"श्रीगुरुचरणमासात"* एका दिवसात 108 वेळा म्हणतो.

     हनुमान चलिसा ही संत तुलसीदासजींनी लिहिलेली प्रार्थना आहे. ही व्याख्या मूख॔पणाची आहे.  ही केवळ प्रार्थनाच नाही तर त्याहीपेक्षा बरेच काही आहे.  हा तुलसीदासजींचा दृष्टीकोन आहे का?  अजिबात नाही. 

     हनुमानजींनी दिलेली शक्ती आहे का? हो मान्य.  पण त्याहीपेक्षा बरेच काही जास्त आहे.  हनुमान चलिसा ही निर्मिती आहे.  *ती करणारा दुसरा कुणीही नसून स्वत: रामच आहे*. ही हनुमान स्तुती आहे.  जी स्वत: रामाने केली आहे.   ती दृष्टी तुलसीदासजींना प्राप्त झाली आणि त्यांनी ती लिहून काढली एवढेच.  *राम हनुमन्ताचा विचार कसा करतो तर असा करतो*.

     आपण नेहमीच राम आणि रामेश्वर मध्ये फरक करतो.  पण मला समजले पाहिजे की हनुमन्त रामाची भक्ती करतो तर राम हनुमन्ताची भक्ती करतो.

     भारतीय संस्कृतीच्या बाहेरील लोकांना कदाचित हे समजणे कठीण होईल.  कारण एका बाजूने विचार करता ते दोघे एकच आहेत तर दुस-या बाजूने ते दोघेही वेगळे आहेत. का? *कारण त्यांचे बाह्य रुप व त्यांची कत॔व्ये ही भिन्न आहेत. जी जगदंबेने त्यांना बहाल केली आहेत*. या जगाची एकमेव निर्माती जगदंबा.    

     तर.....तुलसीदासजींनी हनुमान चलिसा लिहिली त्याची गोष्ट आहे. मी दहा-बारा वर्षांपूर्वी सांगितली आहे.  पुन्हा सांगणार नाही.   तुम्ही जुन्या श्रध्दावानांना विचारु शकता. ते तुम्हांला सांगतील.

     आज आपण अभ्यासणार आहोत हनुमान चलिसा म्हणजे काय?  ती मुळात कसे काय॔ करते?  मी नेहमीच म्हणतो, *"आत्म्यासह मानवी शरीर नाही तर आपण मानवी शरीरासह आत्मा आहोत"*.  हे वास्तव आहे.  आपण स्वयंभगवानाचे अंश आहोत.

     भवसागर हा वादळयुक्त मोठा समुद्र आहे.  ज्याला आपण आपले जीवन म्हणतो.  आपले काहीही नाव असो, आपला कोणताही व्यवसाय असो, आपण भिकारी असो की मोठे उद्योगपती असो पण आपण सव॔ मानव आहोत व आपल्या प्रत्येकाला आत्मा आहे.   बापू! प्राण्यांनाही आत्मा असतो. हो मान्य! तुम्ही सुद्धा याआधी प्राणीच होतात. नक्कीच आपण प्रत्येक जण 84 लक्ष योनींचा प्रवास करुन आलो आहोत.  आपल्या मेंदूमध्ये 84 लक्ष योनींची बीजे आहेत.   आपण मानव कसे झालो?  तर या 84 लक्ष योनींच्या चक्रात फिरुन पुरुष किंवा स्त्री झालो.  बॅक्टेरियासारखा लहानात लहान प्राणी ते इतर सव॔ मोठे प्राणी यांची बीजे आपल्या मेंदू आहेत.

     कोणते बीज वाढवायचे हे आपल्यावर अवलंबून आहे.   जर आपल्यातील सशाचे बीज बलवान झाले तर आपण भित्रे होऊ व सतत घाबरत राहू.  जर हरणाचे बीज बलवान झाले तर आपण भितीच्या विचारानेच पळत सुटू.  

     कोणते बीज विकसित करायचे आणि कोणते नाही हे कसे ठरविले जाते? एका बाजूने आपल्या आधीच्या जन्माच्या कर्मानुसार तर दुस-या बाजूने हया जन्माच्या कर्मानुसार.   थोडक्यात काय तर प्रारब्ध व क्रियमाणानुसार.  पण या सा-याच्या पलीकडे हे आपल्या *नाथसंविधावर* अवलंबून आहे. *नाथसंविध् म्हणजे जगदंबा आपल्या जन्माच्या वेळेस आखते ती योजना*. 

     प्रत्येकाचे नाथसंविध् हे वेगळे असते.  मी नेहमीच सांगतो माझ्या आजच्या दिवसाच्या वागण्यावरुन प्रत्येक सूर्योदयाबरोबर माझे नाथसंविध् ही बदलते हे कायम लक्षात ठेवा. आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी ती आपल्याला मदत करण्यास कायम तयार असते.  *नाथसंविध् ही तिची योजना असली तरी माझ्यातील स्वयंभगवानाचा अंश ते नाथसंविध् स्विकारून त्याप्रमाणे वागतो.  तो अंश तर मी त्याचा अंशी आहे असे वेदांत म्हटले आहे.  माझे स्वतःचे म्हणणे नाही*.

     तो पूर्ण आहे तर मी त्याचा एक भाग आहे. सव॔ देणग्या, उदारता, मदत आपल्या आई कडून मिळालेली प्रत्येक शक्ती आपल्याला आपल्या आत्म्याद्वारेच दिली जाते.  *आपल्या आत्म्याला छद्म आत्मा असे म्हणतात*. छद्म आत्मा म्हणजे आपला स्वतःचा अहंकार. मी असा आहे तसा नाही. मला हे पाहिजे हे आवडत नाही.  *आपल्या सर्वांना भावना आहेत.  आपण संत, संन्यासी किंवा भिक्षू नाही*. 

     प्रत्येकाला भावना आहेत पण आपण कोणतेही नियम पाळत नाही.   स्वतःच्या आयुष्यापुरते बोलायचे झाले तर किती जण परीक्षेच्या आधी वेळापत्रक तयार करतात?  आणि ते काटेकोरपणे पाळतात?  कोणी लठ्ठ आहे. सकाळी लवकर उठून फिरायला जाण्याचा विचार करतो.  त्याकरिता 7-8 हजाराचे बूट आणतो.  मी असे बूट कधीच आणले नाहीत.  त्या बूटांत आपले सुंदर पाय घालतो.  आणखी जे जे काही सुंदर हवे असते ते घेतो आणि शिवाजी पार्क, वरळी सी फेस वरील वाॅकींग ट्रॅकवर जातो.  घरी येतो.  वजन काट्यावर उभा राहतो. त्याला अमुलाग्र बदल अपेक्षित असतो.  जसे माझे वजन 105 किलो वरुन 75 किलो व्हावे.  पण हे चुकीचे आहे.  हे घडणे अशक्य आहे. 

     *आपण आपल्या जीवनातही चुकीच्या कल्पना, चुकीच्या अपेक्षा ठेवतो आणि छद्म आत्म्यास जन्म देतो.  आपल्या चुकीच्या कल्पना चुकीच्या अपेक्षा म्हणजेच "छद्म आत्मा "*.

      वजन काट्याचे उदाहरण ही एक मजा होती. तुम्हांला कळावे म्हणून. आपण स्वतः कडून देखील चुकीच्या अपेक्षा ठेवतो. आपला सभोवतालचा परिसर, माणसे, राष्ट्रे यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि त्यामुळे *आपले मनच आपले शत्रू होते*. हे मनच माझ्या व माझ्या परमेश्वराच्या आड येते.  त्यामुळेच आत्म्याला जगदंबा व स्वयंभगवानाकडून प्राप्त झालेल्या गोष्टी मला प्राप्त होऊ शकत नाहीत. 

       आपल्याला शरीर आहे हे अमान्य करता येत नाही.  आपल्यात *जनुके* आहेत.  त्यामुळेच पौगंडावस्थेत मुले व मुली एकमेकांकडे आकर्षित होतात.  जनुकांमुळेच मला भूक लागते.  भूक लागणे ही काही वाईट गोष्ट नाही.  कोणाला दोनदा तर कोणाला पाच वेळा भूक लागते. यात विशेष असे काही नाही. 

      *माझे पूण॔ जीवन नक्कीच माझ्या शरीरावर अवलंबून असते.  म्हणूनच मला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  शरीराकडे दुल॔क्ष केल्यास मी आध्यात्मिक ध्यास घेऊ शकत नाही.  म्हणूनच स्वतःच्या शरीराची उत्तम रितीने काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे*.

      आपण आपल्या शरीराकडून आणि मनाकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो.   खरं तर त्यांची व इतर गोष्टींची सरमिसळ करतो.  *चुकीच्या अपेक्षा म्हणजेच छद्म आत्मा    सर्व गोष्टींच्या आड येतो. छद्म आत्मा सर्वात मोठा अडथळा आहे*.  हनुमन्त मुळात वधस्तंभावर आहे या छद्म आत्म्याला मारण्यासाठी.  कसा? तर थोडा थोडा, हळूहळू आणि सतत.  त्यामुळे आपल्याला दु:ख जाणवत नाही.  दु:खदायक परिस्थितीतून बाहेर न येता जर आपल्याला छद्म आत्म्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर *मंत्रगजर हा एकमेव राजमार्ग आहे*.

     हनुमान चलिसामुळे महाप्राणाकडून येणारी विश्वाची प्राणशक्ती आपल्याला प्राप्त होते.   हिच प्राणशक्ती प्रत्येक ग्रहाला त्याच्या कक्षेत फिरण्याची शक्ती देते.  *तोच महाप्राण तिच प्राणशक्ती आपल्यात सुद्धा आहे.   आपल्या नाथसंविधानुसार महाप्राण व प्राणशक्ती आपल्या आयुष्यात काय॔रत राहतात*.

      मंत्रगजर 1 माळ, 16, 32 किंवा 108 माळा तुम्हांला पाहिजे तेवढया करा.  या माळा पहिल्यांदा आपल्याला तयार करतात.  त्यामुळेच आपण जगदंबा व तिच्या पुत्राला आपले मन व शरीर तयार करण्याकरिता आमंत्रित करतो.

      मंत्रगजर चार पातळयांवर काम करतो.

👉   प्रथम शरीर व मन तयार करणे.

👉   परमेश्वराकडून शक्ती व मदत ग्रहण करण्याची क्षमता वाढवितो.

👉    प्राप्त झालेली क्षमता कधी, कुठे व कशी वापरायची व त्यातून यश कसे प्राप्त करायचे हे शिकवते.

👉   चुकीच्या गोष्टी करण्यास परावृत्त करते.  आपण सिंहावलोकन केल्यावर मी हे करायला नको होते. माझ्याकडून चूक घडली. ही अपराधीपणाची भावना येते.  *नित्य म॓त्रगजर व वर्षातून एकदा एका  दिवसात 108 वेळा म्हटलेली हनुमान चलिसा माझ्या मनातील सर्व अपराध दूर करतात*. हनुमाना चलिसा माझ्यातील महाप्राण जो निष्क्रीय झाला आहे त्याला सक्रीय करते. *म्हणजेच मन, प्राण, प्रज्ञा एकात्मतेने काय॔ करु लागतात*.

      लहान मुलांना मी कमीत कमी तीन वेळा हनुमान चलिसा म्हणायला सांगतो. कारण त्यांचा लहान मेंदू विकसित होत असतो.  छोट्या मुलांना बरेच प्रश्न पडलेले असतात. त्यांची उत्तरे कोणीच देत नाही.   *ती नेहमी गोंधळलेली असली तरी नेहमी आनंदी असतात*. हिच योग्य वेळ आहे जेव्हा त्यांचे मन तयार होते.  म्हणजे छद्म आत्मा तयार होणार नाही व परमेश्वराकडून बक्षीस रुपात प्राप्त होणा-या चांगल्या गोष्टी त्याच्या व्यक्तीमत्वाचा विकास घडवून आणतील.  *म्हणूनच माझ्या बाळांनी हनुमान चलिसा रोज तीन वेळा म्हटलीच पाहिजे*.  तुम्ही 70 वर्षाचे असा की 80 तुम्ही माझी बाळेच आहात.

      गुरुचरणमासामध्ये 108 वेळा हनुमान चलिसा म्हणा.  जसे जमेल तसे म्हणा पण म्हणा.

      *माझ्या व माझ्या यशस्वी जीवनाच्या आड ज्या गोष्टी येतात त्या बाजूला होतील. हेच हनुमान चलिसाचे महत्त्व आहे*. 

      हनुमान चलिसात 108 मंत्र आहेत.  किती? 108. 108 मंत्र 108 वेळा म्हटले जातात.  अनेक मंत्र तुम्ही स्वत:च सहजपणे ओळखू शकता.  

नासै रोग हरे सब पीरा  ।
जपत निरंतर हनुमत बीरा ॥

होत न आज्ञा बिनु पैसारे ।

      *पैसारे म्हणजे प्रयास.  अवधी भाषेत पयसा म्हणजे प्रयास.   "असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी" हे होणे नाही.  प्रयास करा पण गधा मजूरी नको*.

       प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यपू वाईट वागवतात तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच वागत होता.  हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले, विष दिले तरी देवाने त्याला मरु दिले नाही व खांबात स्वत: प्रगटून हिरण्यकश्यपूचा वध केला. *कारण तो सतत मंत्रगजर करत होता*.

      आपल्या मनाविरुद्ध आई वडील वागले की आपण रागावतो.   *ये मेरा बाप हो नहीं सकता* म्हणतो.  तुम्ही दोघेही माणसेच आहात.  आईवडीलांनी मुलांकडून जास्त अपेक्षा करु नये. 

     *ब-याच वेळा आईवडील आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांची ओझी आपल्या मुलांवर लादतात. हा छद्म आत्मा तयार करण्याचा वेगळा माग॔ आहे.  प्रत्येकासाठी हे चूकच आहे*.   

     माझ्या मुलीला व सूनेला  भयावह चित्रपट पाहताना मी समोर बसून राहिले पाहिजे. कोणता चित्रपट? सगळे जोरात म्हणाले - 1920. त्यातील मनुष्य  हनुमान चलिसा पठणामुळे वाचला.  ती मजा असेल मी मान्य करतो. चित्रपट करमणुकीकरिता असला तरी अनुभवाने एक कळते *हनुमान चलिसा म्हटल्याने आपल्याला मदत मिळतेच*.
     
      *राम नाम मदत करतेच.  त्याच्यावर व त्याच्या आईवर ठेवलेला विश्वास आपल्याला मदत करतोच.  तो कधीच आपली उपेक्षा करत नाही. तुम्ही कसेही असलात तरी.  *"मी तुझा आणि तू माझा आहेस"* एवढेच पुरेसे आहे.  सव॔ बाजूंनी तुमची कशी काळजी घ्यायची हे तो जाणतो. *पण त्याने कसे वागावे याची अपेक्षा तुम्ही ठेवू नका*. तुमच्याकरिता जे जे उचित आहे ते ते तो करणारच.  *तो तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार पण दुकानदाराप्रमाणे नाही तर बापाप्रमाणे* हे कायम लक्षात ठेवा. 

     हनुमान चलिसाची पहिली ओळ "जय हनुमान ग्यान गुन सागर" हा सर्वात मोठा मंत्र आहे.  ज्ञान आपण समजू शकतो.  पण हल्ली कोणाला ज्ञानाची आवश्यकता नाही. गुगलमुळे सव॔ ज्ञान मिळते.  मला ज्ञानी माणसे आवडत नाहीत.  मी जगातला सर्वात मोठा अज्ञानी आहे. मी सर्वात दुल॔क्षिलेला आहे.   

      पण हा ग्यान गुन सागर आहे नुसता गुन सागर नाही. आपल्यातील चांगले गुण उचित मार्गानी आपली प्रगती घडवून आणतात.  आपण हनुमन्ताचा जयजयकार करतो कारण तो ग्यान गुन सागर आहे.   तो माझंही ज्ञान वाढविणारा आहे.   सव॔ प्रश्नांची उत्तरे या ग्यान गुन सागराकडूनच मिळणार आहेत.  हनुमन्तचा श्लोक:-

*अतुलित बलधामं*....
      (प्रत्येकाला येतोच) 

      हनुमन्तापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही आणि त्याचा रेकाॅड॔ कोणी मोडू शकत नाही.   *सव॔ शास्त्रांमध्ये मग ते भौतिक असो की आध्यात्मिक हनुमन्त एकमेव अद्वितीय आहे*.आपल्याकरिता उचित काय हे आपल्याला कळत नाही हिच आपली फार मोठी समस्या आहे. मग श्रीगुरुचरणमासात एकदा तरी 108 वेळा हनुमान चलिसा म्हणणार ना? *हो डॅड*. पूण॔  विश्वासाने म्हटल्यावर हनुमन्त आपल्याला नापास करणार नाही.

       हनुमन्ताच्या भजनात स्वयंभगवान राम तल्लीन होतो हे लक्षात ठेवा.   आपण जेव्हा हनुमन्ताची स्तुती करतो तेव्हा नकळत रामाचीही स्तुती करतो.  तो स्वयंभगवान  भक्ताधीन आहे.  तो आपल्या भक्तांकरिताच सव॔  काय॔ करतो.   तुम्ही हनुमान चलिसा म्हणणार तेव्हा मी तुमच्या जवळच असणार.  तुम्ही जगातल्या कोणत्याही क्लुप्त्या लढविल्यात, शेंडया लावल्यात 
तरी मी जगातला सर्वात वाईट मुलगा आहे.  कठीण कवच फोडण्यास कठीण असते.  म्हणूनच तुम्ही सतक॔ रहा.  प्रेमाने व विश्वासाने हनुमान चलिसा म्हणा.

डॅडनी "जय हनुमान ग्यान गुन सागर"  हा मंत्र 5 वेळा  म्हणून घेतला.   
    
 *I LOVE YOU MY KIDS LOVE YOU A LOT"*
माझ्या बाळांनो मी तुमच्यावर खूप प्रेम करतो.

*लव यू डॅड*

       बापूराया खूप प्रयास करुन  घेतलेस.  अनुवाद करताना काही चुकले असल्यास क्षमस्व!🙏🙏🙏

✍  from  whatsApp group

Thursday, November 9, 2023

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१४.११.२०१३- कामधेनू गोमाता गोपद्म विशेष )

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१४.११.२०१३- कामधेनू गोमाता गोपद्म विशेष )
॥ हरि ॐ ॥

ॐ मंत्राय नम: ॐ रामवरदायिनी बघताना आपल अनेक algorithem बघत चाललो आहेत. हे algorithem म्हणजे विश्वाची रचना आहे. म्हणजेच स्वत:चीच रचना आहे. म्हणून हे algorithem आमच्या नित्याच्या जीवनात व्यवस्थित बसतात, काम करत असतात. हे फक्त ऐकून सोडून चालणार नाही.

असाच एक आदिमातेचा algorithem आहे. कुठलेही शुभकार्य असताना स्वस्तिक सोबत दारात गोपद्म काढतात. चार गोपद्म काढली जातात.

आम्हाला माहीतच आहे गाय पवित्र आहे म्हणून तिची चार पावले काढली जातात. सध्या ३ दिवस तुलसी विवाहाचे दिवस आहेत. पूर्वी तुळशी वृंदावन असायचे तिथे सकाळ संध्याकाळ गोपद्म काढली जायची.
ज्यांच्या घरी गौरी येते त्यांना माहीत असेल दारात गोपद्म काढल्याशिवाय गौरीला आत आणत नाहीत का? म्हणजे  कुठेतरी देवीतत्वांशी ह्याचा संबंध आहे.
तुळशी वृंदावनासोबत अजून एका ठिकाणी गोपद्म काढली जातात? कुठे? गोपद्म काढणे अत्यावश्यक मानले जाते? प्रत्येक स्त्री ती गोष्ट दरवर्षी करतेच ती म्हणजे भाऊबीज.
भाऊबीजेच्या दिवशी जेव्हा पाटावर बसून ओवाळले जायचे तेव्हा गोपद्म काढले जायची भाऊबिजेशी गोपद्मचे नाते काय?
हा गोपद्म जेव्हा algorithem म्हणून समजून घ्यायचा तेव्हा आपल्याला काय जाणून घ्यायचे. आदिमातेची तीन स्वरूपं स्थूल (अनसूयामाता), सूक्ष्म ( माता) व तरल (गायत्रीमाता) पातळीवरची पण ह्या आधीची दत्तगुरूंची ’नि:स्पंद’ जाणीव म्हणजे अदिती.
गोपद्म म्हणजे गोमातेची चार पावले आहेत.
दिवाळीची सुरुवात वसुबारसच्या दिवशी होते. या दिवशी पूर्वी गाय व तिचा वत्स म्हणजेच वासराचे पूजन केले जायचे.
सप्तपदीच्या वेळी तुम्ही ७ पावले घेता त्या ७ पावलांबरोबर, ७ शपथा, ७ promises, ७ वचने असतात.
इथे गोमातेची ४ पावले आहेत. ह्या पावलांसोबत गोमाता काय घेते हे बघायला हवे. ही गाय आपल्या भारतीयांसाठी पवित्र आहे. म्हणजे नक्की काय? प्रत्येक गाय ही भारतीयांनी कामधेनू मानलेली आहे. कामधेनू नावाची गाय जी ऋषी वसिष्ठांकडे होती ती आधी जमदग्निकडे होती. ही कामधेनू म्हणजे तिच्यावरच्या प्रेमाने ज्यांनी तिला माता मानले त्यांना तिने पाहिजे ते पुरवले.पण ज्यांनी मदांध बनून तिला भोग्य मानले त्या प्रत्येकाचा तिने नाश घडवून आणला. ह्या कामधेनूचा अंश प्रत्येक गोमातेत असेल असा वर गोमातेला मिळाला म्हणून आम्ही गाईला पवित्र मानतो. आजही गोमातेला जे नमस्कार करतात ते मला आवडते. कुठलेही पाप चालेल पण गोमांस खाण्याचे पाप कधीही करू नका. एकवेळ ऊपाशी रहा पण गोमांसला स्पर्शदेखील करू नका. 
 गोमाता जेव्हा जगेल तेव्हाच हिंदुस्तान जगेल. गोमांसला कधीही, चुकुनही स्पर्शही करु नका. जेव्हा नॉनव्हेज खायला बाहेर जाल तेव्हा हे कन्फर्म करा. चीझ खातानाही ते चीझ व्हेज आहे ह्याची खात्री कारा. गाय ही आपल्याला अतिशय पुजनीय आहे आणि गोमातेचे रक्षण करणे हा आपला धर्म आहे. 
तुम्ही जेव्हा non-veg जेवायला बाहेर जाता तेव्हा एखादे पदार्थाचे नाव कळले नाही तर विनासंकोच विचारा, कुणाचे मांस आहे ते. चुकून खाल्ले तर मी त्यातून बाहेर काढू शकेन, पण मुद्दामहून कधीच गोमांस खाऊ नका. cheese खाताना पण विचारा ते veg आहे की non-veg आहे. काही ठिकाणी cheese गोमातेच्या enzymes पासून बनवले जातात. अभक्ष भक्षण केलं तर त्याचं पाप लागणारच. म्हणून शाकाहारी cheese खाण्यासाठी आग्रह करा. ह्या आधी चुकून खाल्ले गेले असेल तर ते पाप मी धुऊन टाकले. त्याची काळजी करू नका. यापुढे मात्र दक्ष रहा.
गोमांस व गोहत्येचे पाप आपल्याला लागता कामा नये. पॅकेजवर हिरवा dot असतो. तो बघून veg cheese वापरा.
समजा चुकून खाल्ले गेले तर शांतपणे सांगा अनिरुध्दा मी विसरलो. अशावेळी माझ्यासाठी सोपे आहे.
म्हणून गुरुपौर्णिमेला मी सांगतो तुमची पापं मला द्या.
आदिमातेचे नियम तिच्या बाळांसाठी आहेत. तुम्ही तिचे कैदी नाहीत. त्या नियमांचे पालन करुन घेण्याचे काम तिने तिच्या पुत्रांकडे दिलं आहे. प्रत्येक घरी शिस्त बाणणं अत्यंत आवश्यक असते.
कामधेनू ही संकल्पना वैदिक आहे. कामधेनू म्हणजे काय? तर आदिमातेची सर्व मंगल करण्याची इच्छा मनुष्याला ज्या शक्ती नाडीद्वारे प्राप्त होते. त्या शक्ती नाडीसच ऋषीमुनी कामधेनू म्हणतात.
शक्ती नाडी म्हणजे आईच्या गर्भात बाळ नाळेशी जोडलेलं असतं त्याचप्रमाणे तुम्ही सगळेजण त्या आदिमातेशी नाळेद्वारे direct जोडलेले असतात त्यालाच शक्ती नाडी असे म्हणतात तीच कामधेनू.

ही असते कुठे? जे जे म्हणून पृथ्वीच्या, वसुंधरेवर जे जे म्हणून अवकाशातून खाली येते. त्या प्रत्येक गोष्टीत ह्या शक्ती नाडीचे अस्तित्व असते.
पृथ्वीच्या ionic sphere च्या खालून जे येते ते शक्ती नाडी, पावसाचा प्रत्येक थेंब, सूर्याचा प्रत्येक किरण हे शक्ती नाडी स्वरुप आहे.

चंद्रप्रकाश हे शक्तीनाडी स्वरूप आहे. वीज हीसुध्दा शक्तीनाडी स्वरूप आहे.

sunlight (सूर्याचा प्रत्येक किरण)

moonlight (चंद्राचा प्रत्येक किरण)

rain (पावसाचा प्रत्येक थेंब)

electricity (आकाशात कडाडणारी वीज)

ह्या चार गोष्टी पृथ्वीवर आल्यानंतर येत असताना, २४ तासापर्यंत शक्तीनाडीचे काम करत असतात. २४ तासापर्यंत अहोरात्र १ दिवस - १ रात्र त्यांच्यात शक्तीनाडीचे कार्य करण्याची क्षमता असते.

ह्या २४ तासात जे पावसाचे पाणी जी झाडे खेचून घेतील ती झाडे पण शक्तीनाडीचे काम करतात.

तसेच सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश शक्तीनाडीचे काम करत असतात.

वरती चमकणारी वीज आपल्या शरीरात खेळतच असते. विद्युत शक्ती ही प्रत्येक मानवाच्या शरीरात असते. मेंदूत electrical impulse असतात. Heart-beat electricity मुळेच चालू आहेत. ही विद्युत शक्ती म्हणजेच कामधेनू आहे. शक्तीनाडी स्वरूप आहे.
गोविद्यापिठम्‌ मध्ये गाईंची सुंदर जोपासना केली जाते. तिथे गोग्रासची सुविधा आहे.
तुम्ही जेव्हा एका गाईला पवित्र मानून पूज्य मानून तिचे पूजन करता, तिला जगवता, मानता तेव्हा तुमच्या शरीरातील विद्युतशक्ती समर्थ बनते, बलवान होते. म्हणजेच तुमच्या शरीरातील इच्छा शक्ती ही कामधेनू बलवान करते. गाईच्या चार पावलापैकी कामधेनू हे तिचे स्वरूप हे तिचे पहिले पाऊल.

गाईची ४ पावले म्हणजे

१. कामधेनू स्वरूप - पहिले पाऊल

२. गायत्री मंत्र - दुसरे पाऊल

३. विश्वात्मक शक्तीनाडी - तिसरे पाऊल

४. देहस्थ शक्तीनाडी - चौथे पाऊल

गायत्री मंत्रावर मी  ३ १/२ तास बोललो होतो. गायत्री मंत्र म्हणजे काय? आपल्या धृतीला प्रज्ञेला (बुद्धीला) प्रकाशित करण्यासाठी त्या सवितृला (दत्तगुरूंना) केलेले आवाहन आहे.

आम्हाला गायत्री मंत्र म्हणावासा वाटला तर सद्‍गुरु गायत्री मंत्र म्हणावा. कुणाला गायत्री मंत्र सकाळी म्हणायचा असेल तर १२ वेळा म्हणावा. गायत्री मंत्र केवळ ब्राम्हणांनी म्हणावा हा चुकीचा समज आहे.

हे गोपद्म म्हणजे ह्या कामधेनूची ४ पावले आहेत. गोपद्ममध्ये माझ्या लहानपणी जी पध्दत पाहिली ती म्हणजे २ पावले माझी आई कढायची व २ पावले वडील काढायचे.

गोपद्मावर साधी हळद-कुंकू वाहा. ही कामधेनू आमची इच्छाशक्ती वाढवणारी आहे.
मातेची जी इच्छा आहे, जी सर्व पुरुषार्थ देणारी आहे.

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंब्यके गौरी नारायणी नमोस्तुते

कामधेनू सूक्त म्हणणे कठीण आहे. कामधेनू सूक्ताचं पठण करून हवन केल्यावर जे यागाचं पुण्य मिळतं तेच पुण्य ही चार गोपद्म घराच्या उंबरठ्यावर किंवा देव्हार्‍यासमोर काढली व त्यावर हळद कुंकू वाहिलं की मिळतं.

कामधेनू - सूक्ष्म रूपात

गायत्री मंत्र - ध्वनी रूपात
 
विश्वात्मक - विद्युत रूपात

देहस्थ शक्ती - देहस्थ विद्युत

जे आदिमातेने तयार केले ते माणसाला सहज पेलता यावे यासाठी ती algorithem तयार करते.

प्रत्येक गाईत हा कामधेनूचा जर अंश असेल तर प्रत्येक गाय पूज्य असलीच पाहिजे. पूर्वी श्रावणी सोमवारी गाईला एक ताट दिले जायचे.
दुष्काळग्रस्त भागात चारा मिळत नाही, त्यामुळे गुरे कसायाच्या हातात जातात. म्हणून आपण चारा लावतो आणि अशा गुरांना देतो.

पूर्वी दारासमोर रोज सारवून गोपद्म काढली जायची. आपण रोज देवासमोर उंबरठ्याबाहेर गोपद्म काढू शकतो.

जेव्हा मंगलयान गेले तेव्हा सगळे scientist प्रथम त्याची प्रतिकृती घेऊन तिरुपतीकडे गेले. परमेश्वराच्या चरणी जायची त्यांना लाज वाटली नाही.

आम्ही उदी लावताना, नमस्कार करताना पण लाजतो.

सणासुदीच्या दिवशी तरी गोपद्म काढा. ३ तासाच्या कामधेनू सुक्ताऐवढेच पुण्य गोपद्म काढल्याने मिळते.

ज्या घरासमोर गोपद्म काढले जाते त्या घरातील प्रत्येकाला त्याचे पुण्य लाभतेच अशा घरात जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या घरी आत येतो तेव्हा त्याची वाईट करण्याची शक्ती नाहीशी होते.

म्हणून गोपद्म उंबरठ्यावर काढले जाते. ज्या घरासमोर गोपद्म असतील त्या घरातून बाहेर जाताना प्रत्येक व्यक्ती शुभ ताकद घेऊन जाणार आहे.

वसुबारसच्या दिवशी गोपद्म अवश्य काढा त्या दिवशी ” ॥ ॐ श्री सुरभ्यै नम: ॥ ” हा मंत्र म्हणा. सुरभी म्हणजे कामधेनू. हा मंत्र कमीतकमी ५ वेळा म्हणा. हा कामधेनूचा श्रेष्ठ मंत्र मानला जातो ह्या मंत्राचा जप वसिष्ठांनी केल्यामुळे त्यांना अख्खीच्या अख्खी कामधेनू प्राप्त झाली.

ही गोपद्म अवश्य घरासमोर काढावीत हा कामधेनूचा मंत्र आपण दररोज देखील म्हणू शकतो.
जेव्हा जेव्हा पाडवा, भाऊबीजेला औक्षण कराल तेव्हा नक्की गोपद्म काढा.

॥ हरि ॐ ॥

Friday, October 27, 2023

Kojagiri Poornima

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.१०.२०१२- कोजागिरी पौर्णिमा विशेष)
॥ हरि ॐ ॥
 
आज विजयादशमी सगळ्यांना असे वाटते की आजच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करायचे एवढ्यापुरतेच दस‍र्‍याचे महत्त्व असते. 
 
दसर्‍याचे खरे महत्त्व आहे ते सीमोल्लंघनाचे. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या सीमा सोडून बाहेर जायचे. याचा अर्थ चांगल्या सीमा सोडायच्या असे नाही. मर्यादेच्या बाहेर जाऊन वागणे चुकीचेच आहे. सीमोल्लंघनाचा खरा अर्थ म्हणजे सीमा विस्तारणे. आपल्या क्षमता, capacity, potency वाढवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. सकाळी सरस्वतीदेवतेची व संध्याकाळी शस्त्रांची पूजा केली जाते. म्हणजेच ज्ञान व विज्ञानाची ह्या दिवशी पूजा होते. हे कशासाठी? तर स्वत:चे कौशल्य, compatibility वाढवण्यासाठी.
 
आज आपण इतकी वर्षे इथे जमतोय त्यामुळे आम्ही पूजा कशी करायची हा प्रश्न आम्हांला पडता कामा नये. मी मागे सांगितले होते, "एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा." कधी आठवतेय? नाही ते पण आठवत नाही. ह्या वर्षाच्या सुरुवातीला आता वर्ष संपायला दोनच महिने उरले आहेत. मग ह्या वाक्याच्या आम्ही किती जवळ गेलो हे तुम्ही स्वत:च ठरवा.
 
ह्या विश्वासाच्या जवळपास आम्ही किती पाऊल टाकले ह्याचा विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही वर्ष संपायला २ महिने ७ दिवस बाकी आहेत.
 
हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे. "विश्वास असावा म्हणजे काय?" तर हा सगळं जाणतोच. मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याला माहीतच आहे, हा विश्वास आधी मला स्वत:मध्ये निर्माण करायला हवा. ह्याच्यासमोर आम्ही नाटक करत राहतो म्हणून आम्ही फसतो. तुम्हाला नाटक करायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे जेवढे तुम्ही खोटेपणाचे नाटक कराल, तेवढी माझी जबाबदारी कमी होते. तुम्ही व तुमचे कर्म इतका सोपा हिशोब इथे आहे. पण हजारो वेळा सांगूनही अजूनही आम्हांला समजत नाही.
बापूंनी तपश्चर्या केली आज उपासनेचाही शेवटचा दिवस आहे. उपनिषदही लिहून झाले. जे दत्तजयंतीला सर्वांना उपलब्ध होईल. हे सगळं बापू का करतोय? बापूचं घर चालावं, ह्या ग्रंथाची रॉयल्टी मिळावी म्हणून नाही. तो समर्थ आहे त्याचे कार्य करायला.
 
हा (परमपूज्य बापू) कर्मस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असल्यामुळे जोपर्यंत त्याच्यापुढे माझा "मी" open करत नाही, तोपर्यंत काहीच घडू शकत नाही. म्हणून गुरुच्या समोर उभे राहून कधीही नाटक करू नका. एक गोष्ट आज सांगतो. जेव्हा अमृतमंथन झाले, तेव्हा अमृत व हलाहल विष त्यातून निर्माण झाले. ह्यातील हलाहल प्रथम बाहेर आले. मग आपण हलाहल मंथन का म्हणत नाही? विष शिवाने प्राशन केल्यावर मिळालेल्या अमृतामुळे देवगण अमर झाले. त्यांना हव्या असणा‍र्‍या सर्व गोष्टी मिळू लागल्या व मृत्यूचे भयही उरले नाही. त्यामुळे ते पूर्णपणे relax झाले. परमात्म्याचे सेवेकरी म्हणून त्यांना माज चढला. ह्या देवगणांचा माज पहिल्यांदा दिसला तो त्या शेषधारी विष्णूलाच.
 
ह्या विष्णूला भेटायला जेव्हा नारद आला, तेव्हा त्याला न बघताच महाविष्णूने कूस बदलली. देवर्षी नारद म्हणजे सगळ्या भक्तांसाठी एकमेव जवळचा आप्त, ह्याने कुठलाही यज्ञ कधी केला नाही, केवळ नामस्मरणानेच देवर्षी पदाला पोहोचलेला आहे. 
 
लक्ष्मीमाता विष्णूचे लक्ष नाही हे बघून त्यास नारद आल्याचे सांगते. तेव्हा विष्णूने एक आळस देऊन विचारले काय झाले? नारदाचे व विष्णूचे बोलणे म्हणजे जगात चालणार्‍या गोष्टींचे gossip नसून विश्वाच्या कल्याणासाठी चाललेला वार्तालाप असतो.
 
विष्णू नारदाला विचारतो, "विश्वाचा कारभार बघणार्‍या देवगणांचे कसे चालले आहे?" याबद्दल मला एका वाक्यात सांग. त्यावर नारदाने एका वाक्यात उत्तर दिले, "कोण देवगण?" इथे उत्तरातच प्रश्न येतो पण हा प्रश्न नसून खरे उत्तरच होते. कारण नारदासाठी देवगण अस्तित्वातच राहिले नव्हते.
 
जसे श्रद्धावानांच्या गोष्टी चण्डिकेपर्यंत पोहचविणारा महाविष्णू हा चण्डिकेचा कान तसेच नारद म्हणजेच नामस्मरण हा महाविष्णूचा कान म्हणून जेव्हा देवगण त्यांच्या कार्यापासून च्युत झाले तेव्हा ते देवगण राहिलेच नाहीत.
 
नारदाचा प्रश्न ऐकून लक्ष्मीमाता नारदाला सांगते, "देवगण म्हणजे जे देवाची व मानवाची सेवा करतात ते." त्यावर नारदाने उत्तर दिले, "पण मला असे कोणीच दिसले नाही." हा दिवस होता पितृपक्षाचा पहिला दिवस. नारदाचे उत्तर ऐकून लक्ष्मीमाता महाविष्णूला विचारते, "मी शोधू का कुठे आहेत ते देवगण?" महाविष्णू आळस देऊन म्हणतो, "तुला जे करायचे ते कर."
 
लक्ष्मीमाता पृथ्वीवर सगळीकडे फिरते व बघते की, कावळ्यांसाठी ठेवलेले अन्न देवगण खात आहेत. एवढी ह्यांच्यावर वाईट परिस्थिती का आली? हा प्रश्न तिला पडतो, ती परत विष्णूकडे येते, व विष्णूला ह्याचे उत्तर विचारते. विष्णू तिला म्हणतो, "बाई तूच शोध घे, मला झोपू दे."
लक्ष्मी परत पृथ्वीतलावर जाते व बघते की, सगळे भाविक लोक व्यवस्थित पूजा करत आहेत, देवाला नैवेद्य अर्पण करत आहेत. मग ते ह्या देवगणांपर्यंत का पोहचत नाही? असा प्रश्न तिला पडतो. हे देवगण जर पितरांचे खातात, म्हणजे पितर उपाशी राहतात.
ती महाविष्णूला परत येऊन विचारते, तेव्हा महाविष्णू म्हणतो, "पितरांची तू काळजी करू नको त्यांचं बघायला मी आहे."
 
लक्ष्मी नारदाकडे जाते, तेव्हा नारद म्हणतो विष्णूला जागे कर. लक्ष्मीमाता प्रेमाने विष्णूस जागे करते. विष्णू तिला म्हणतो, "काळजी करू नकोस. लौकिक जगातील अन्न पितरं कसे खाणार? त्यांना चतुर्मितीतून त्रिमितीत येण्याची तू permission देतेस का? नाही नां. काळजी करू नकोस पितरांना अन्न अर्पण करणे लोकांची भावना आहे.
 
लक्ष्मीमाता म्हणते, उद्यापासून मी ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पृथ्वीवर संचार करण्यासाठी जाते. विष्णू म्हणतो, "उद्यापासून नवरात्र सुरू होते आहे."
 
लक्ष्मीमाता बघते पृथ्वीवर सगळे भक्तिभावाने नवरात्र साजरी करत आहेत. मग ती देवगणांकडे येते. पण तिथे सगळे आपल्याच विश्वात मग्न असतात. कुणीही नवरात्र साजरी करताना दिसत नाही. लक्ष्मीमाता रूप बदलून त्या देवगणांना विचारते, "तुमचे असे वागणे विष्णूला कळले तर?" देवगण त्यावर तिला उत्तर देतात, "विष्णूला त्या नारदाने सांगितले तरच कळते, नाही तर काही कळत नाही." तेव्हा लक्ष्मीला जाणवते की, ह्या देवगणांची कृतज्ञता, श्रद्धा, विश्वास नाहीसे झाले आहे. ह्यांना अमृतामुळे सर्व मिळाले आहे. ह्यांना मागण्यासाठी काहीही उरले नाही, त्यामुळे कुठलीही गरजही उरली नाही.
 
लक्ष्मीचे मन कळवळते, तिला वाटते, देवगण चांगले आहेत, त्यांनी सुधारावे. ती विष्णूकडे परत जाते व त्याच्याकडे वर मागते, "मी आज पृथ्वीवर संचार करायला जाईन व जो कोणी रात्री जागा असेल, देवाची वाट बघत, देवावर विश्वास ठेवून तर त्याला आशीर्वाद देईन व असे प्रत्येक महिन्यात करण्यासाठी तू परवानगी दे." विष्णू म्हणतो, "दर महिन्याला मी परवानगी देऊ शकत नाही. वर्षातून एकदाच तू हे करू शकतेस. उद्या पौर्णिमा आहे." लक्ष्मीमाता म्हणते, "उद्या जी कोणी "कोऽजागरति"  म्हणत देवाची भक्ती करत जागा असेल त्याची त्याने कधीतरी मागे केलेली भक्ती मी जागृत करेन."
कोजागिरी पौर्णिमा आता पुढच्याच आठवड्यात आहे. गुरुक्षेत्रम्‌मध्ये अनेकजण जागरणाला येतात, रात्रपठणासाठी. पण मी खाली जातो तेव्हा अर्धे अधिक झोपलेले असतात. जागरण जरी गुरुक्षेत्रम्‌मध्ये नाही जमले तरी घरी करा, चालेल पण नीट जागे राहून करा. रात्र पठणानंतर सकाळी ६ वाजले की जायची घाई असते. कधी एकदा ६ वाजतात एवढे सगळ्यांचे घड्याळाकडे लक्ष असते, खाली सगळे झोपलेले असतात, मी वरती जागा असतो. सकाळी ६.०५ ला खाली आलो तर कुणीच दिसत नाही, तिथे सगळे सपाट असते.
 
एक दिवस रात्री झोप नाही झाली तर आमच्यासाठी तो प्रलय असतो. जगबुडी झाल्यासारखी आमची अवस्था होते. दुसर्‍या दिवशी पित्त काय उठते, हात-पाय काय गळतात सगळ खोटं आहे हे.
 
मेडिकल field मधले इथे बरेच आहेत. आम्ही M.D. करताना ३-३ रात्री जागे राहून काढायचो. Doctor ने night duty च्यावेळी alert रहावे अशी अपेक्षा असते मग तुम्ही का एक रात्र जागे राहू शकत नाहीत?
 
आम्ही देवाचे करतो म्हणजे स्वत:चे करतो. तुम्हाला काय वाटते, तुम्ही दिवा नाही लावला तर त्याच्याकडे अंधार असणार का? नाहीच.
 
जेव्हा देवगणांनी त्यांची मर्यादा सोडली तेव्हा त्यांची कशी परिस्थिती झाली हे विसरू नका. मनुष्याचे असेच होत असते. संकट येताना मनुष्याला दिसेलच असे नाही. त्सुनामी येते तेव्हा तुम्ही बघितले असेल दुसर्‍या व चौथ्या मजल्यावरचा मरतो पण तिसर्‍या मजल्यावरचा मात्र जिवंत राहतो. हे कसे घडते, हे समजण्याची तुमची capacity नाही हे लक्षात ठेवा.
 
तुम्हांला काय वाटते तुम्ही प्रसाद देता म्हणून देव तुमच्यासाठी करतो. तो काय तुमचा केटरर आहे. विश्व उत्पन्न करताना त्याच्या इच्छेने झाले तेव्हा त्याला आमच्या पूजेची मदतीची गरज लागली नाही. हे नेहमी ध्यानात ठेवा.
हे जे उपनिषद माझ्या आईने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते खरचं सांगतो, अधाश्यासारखे वाचा. तुमच्या प्रत्येक संकटातून तुम्हांला बाहेर काढून ते तुम्हांला चांगल्याच मार्गावर घेऊन जाणार.
 
ज्याचा ह्या वर्षी "कर्ता हर्ता गुरू ऐसा" हा संकल्प सिद्ध होईल, तोच पुढच्या काळात तरणार. मी जे काही करतो, ते देवाला कळत नाही, त्यामुळे तो action घेत नाही  हा विश्वास खोटा आहे, हा टाकून द्या. प्रत्येक गोष्ट ह्या चण्डिकाकुलाला नीट कळत असते, जो कुणी त्याच्याशी खोटं बोलतो तो मग नियमांच्या प्रांतात जातो.
पण जेव्हा त्याच्यावर पूर्णपणे श्रद्धा असते, तेव्हा जरी तुमच्याकडे काही कमी पडत असले तरी ते कुठल्या ना कुठल्या चांगल्या मार्गाने तुम्हांला मिळत राहते.
 
पोलिओचे थेंब नाही घेतले तर पोलिओ होईल हे सांगणे म्हणजे doctor ची तुम्हाला धमकी नसून तुमच्याविषयी कळकळ असते.
मी पण डॉक्टरच आहे. आजचे हे सांगणे म्हणजे बापूची धमकी समजू नका. माझी तपश्चर्या, उपासना, तुमच्यासाठी तळमळ हे तुमच्यासाठी vaccine आहे पण हे vaccine टोचताना जर तुम्ही जत्रेत नाचायला गेलात तर कसे होईल?
 
साईसच्चरित प्रॅक्टिकल मध्ये आपण बघितले, जसे प्रवाहात अनेक लाकडे एकत्र येतात व पुढे परत वेगळी होतात. तसेच जीवनात असते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मुळे अनेक दूरची नाती पण जवळची वाटायची आता मात्र जवळची नाती पण दूरची वाटतात. नातेवाईक बदलत जातात पण नाती तीच राहतात. जीवनाच्या प्रवासात अनेक वेगवेगळी माणसे भेटतात पण ह्या प्रवासाला आधार देणारा एकच सद्‌गुरु असतो.
 
जो ह्याला विन्मुख होतो, त्याला सुख मिळू शकत नाही, त्याचं जीवन कृतार्थ होत नाही. आज आपल्या न नशिबाने मातृवात्सल्यविन्दाम्‌, गुरुक्षेत्रम्‌, रामरसायन आहे. आपण खूप श्रीमंत आहोत. आपल्याला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही. तुम्ही मला गुरू मानू नका मला काहीच फरक पडत नाही. तुम्ही कुणालाही गुरू माना, पण पूर्ण विश्वास ठेवा कारण येणारा काळ अतिशय बिकट आहे. आज तरुण वयाच्या मंडळी कामाच्या stress ने दबलेली असतात. Divorce चे प्रमाण तर अगदी चण्या-फुटाण्यासारखे झाले आहे. Divorce फक्त नवरा बायको मध्ये होत नाही, तर मैत्रीत होतो, भावंडांमध्ये होतो. संसार प्रेमाने टिकवायचा असतो. प्रेमाची माणसे मिळत नाहीत. वाईट माणसांना कधीही सुख लाभत नाही हे लक्षात ठेवा जे सद्‍गुरुचरणी निष्ठावान आहेत, चण्डिकाकुलाशी प्रामाणिक आहेत तेच प्रेमाने, सुखाने राहू शकतात.
मी माझ्या अनंत काळाच्या अनुभवाने हे तुम्हांला सांगत आहे. संकट कुणाला येत नाहीत. राम-कृष्णालाही संकटे आलीच ना. प्रत्येक संकटातून तरण्याचा मार्ग असतो तशी संधीही तोच देतो. एक दिवस असं समजा तुम्ही कृष्ण आहात. खरचं सांगतो तुम्हांला पाप लागणार नाही.  तुम्हाला स्वत:च्या आप्तांसोबत हिरे-माणकांनी बनविलेली द्वारका बुडवावी लागली तर विचार करा,  किती दु:ख झाले असेल कृष्णाला.
 
आयुष्यात सगळं करा, पण ते चण्डिकाकुल व त्याचे द्वार असणार सद्‍गुरु ह्यांच्यापासून कधी दूर जाऊ नका. अमृतमंथन खरं तर हलाहल मंथन आहे. समजा तुम्ही लग्नाला उभे राहिलात आणि समोरची स्त्री किंवा पुरुष अतिशय श्रीमंत आहे पण त्याच्या मागे जहरीला साप आहे तर तुम्ही पुढे जाणार का? नाही. हे जहरीले विष म्हणजेच चुकीच्या गोष्टींची मदत घेणे. हे निस्तरण्यासाठी ते विष शिवालाच येऊन प्यावे लागते.
 
माझे ह्याआधी अनेक जन्म झाले असतील, पण ह्या जन्मात मला संधी मिळाली आहे ही संधी परत येणे नाही. ह्यापुढे अडीच हजार वर्षांनंतर चार प्रलय झाल्यावर परत नवे युग आल्यावर ही संधी येईल. हा जन्म देवासाठी राखून ठेवा आमची first priority ह्या जन्मात चण्डिकाकुलच असू दे. आज उपासनेचा शेवटचा दिवस असूनही केवळ तुम्हांला हे सर्व सांगण्यासाठी माझ्या आईची permission घेऊन मी इथे आलो आहे. आपण physics शिकलो आहोत. आपण बघतो quanta सतत बदलत असतो. मानवामध्ये तीच अवस्था असते सतत बदल घडत असतो.
 
ज्याचा quanta बदलत नाही असा तोच एकमेव आहे. तो कधीही बदलत नाही, त्याचा शद्बही कधी बदलत नाही. ज्याक्षणी त्याच्या शद्बाचा आदर राखला गेला नाही, की तो त्याचा शद्ब पाळायला बंधनकारक राहत नाही. तो प्रेमळ आहे त्याची आई साक्षात क्षमा आहे. अनंत क्षमा हेच तिचे स्वरुप आहे. आणि म्हणूनच माझ्याकडे क्षमा आहे. पण मला तुम्ही क्षमा करण्याची संधी द्या. आपला बाप तो आपला बाप, दुसर्‍या कोणाला दया येणं शक्य नाही, हे साईनाथांनी सांगितल आहे, मी नाही. मी एकदाही साईंना बघितले नाही.
"तो" रुप घेऊन येवो की न येवो त्याच्या वरचा विश्वास दृढ ठेवा. तिच्या इच्छेने (आई चण्डिकेच्या) घडते ते स्वरुप तो स्विकारतो पण तो कधीही बदलत नाही. म्हणूनच आमच्या शरिरातील सतत बदलणार्‍या quanta ला आधार फक्त त्याचाच असू शकतो. ३१ डिसेंबर पर्यंतच ही संधी आहे मग तुम्ही म्हणाल नंतर जन्म घेणार्‍या बाकीच्यांचे काय? तर ज्यांना "त्याची" जाणिव आहे व जे मनापासून गुरूमंत्र स्वीकारतील त्यांच्या प्रत्येक जन्मात मी कायम पाठीशी उभा राहीन. त्यांना मृत्यु कधीच नसेल. जेव्हा सत्ययुग सुरु होते तेव्हा जन्माला घालतानाच मानवाला गुरुमंत्र कानात सांगितला जातो. त्रेतायुगात जन्माला आल्यावर गुरुमंत्र ऐकवला जातो. द्वापारयुगात वयाच्या सातव्या वर्षी गुरुमंत्र दिला जातो. तर कलियुगात तो अर्जन करावा लागतो. तो आज आपण मिळवला आहे. गुरुमंत्र माझ्याकडे आहे म्हणजे सगळे आहे.
 
आज बलचे text book प्रकाशित होते आहे. गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणजेच मोठी बलविद्या. गुरुक्षेत्रम्‌ मंत्राची जी बलविद्या आहे, ती ज्याला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यालाही शक्य आहे.
 
ह्या माझ्या आईच्या हातातील १८ शस्त्रे जो कुणी खरा श्रद्धावान आहे व ज्याला ९ निष्ठा मान्य आहेत. त्याला कायम सहाय्यकारी होतील हा वर मी माझ्या आईकडून मिळवला आहे व हा वर तुम्हांला देण्यासाठी आज मी इथे आलो आहे.
 
खरचं तुम्ही भाग्यवान आहात. मातृवात्सल्यविन्दानम्‌ घेऊन पुढे चला पण आजपासून निश्चय करा -
 
"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा"
 
आज प्रेमाने आपण जयंती मंगला काली हा गजर करायचा आहे व आज रात्री प्रत्येकाने म्हणा -
 
"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा"  व प्रेमाने आपल्या गुरुला  म्हणा - "I LOVE YOU"
 
॥ हरि ॐ ॥
जय जगदंब जय दुर्गे
जय श्रीराम
अंबज्ञ
नाथसंविध्
#K10
🙏🏼❤️❤️🙏🏼

Tuesday, October 24, 2023

अहिल्या माता शीळा होण्यामागची कथा. -2

*प्रसंग चौथा*
वर्ष ३७ वे. याज्ञवल्क्य ऋषी निघालेत लेकीला भेटायला. रस्त्यात त्यांना त्रिविक्रम आणि माता जगदंबा एका मायलेकरांच्या नाट्य प्रसंगातून साक्षात्कार, संकेत देतात. 
त्यांना कळते आता अहल्येचा पुत्र शतानंदाना अहल्येच्या भेटीला घेऊन जाण्याची वेळ आली. 
ते शतानंदानकडे जातात. 
त्यांना सांगतात,,, स्वयंभगवानाने मला तुला मातेच्या भेटीला नेण्याचा संकेत दिला.
झाले....... 
दोघेही तिकडे जातात. अहल्या रूपी शीळेतुन अव्याहत महामंत्र गजर ऐकू येत होतात. 
आजुबाजुचा परीसरही मंत्रवत झाला होता. आणि आता अचानक चतुर्भुज स्वयंभगवानाचे दर्शन त्यांना झाले. 

पहिले आनंद झाला. कारण खूप खूप प्रेम होते शतानंदाचे स्वयंभगवानावर. 
पण दुसऱ्याच क्षणाला शतानंद त्रिविक्रमावर रागावून बोलु लागले. 
ते म्हणाले, मला खुप राग येतोय देवा तुझा. 
तु का ताटातुट केली मायलेकरांची.... 
माझे वडील गौतम ऋषी चुकले पण तु हे सगळे होण्यापासून थांबवू शकत होता. 

असे रागावून, चीडून बोलून झाल्यानंतर सगळे शांत होते. 
आणि एकदाचे सगळे मनातले बोलून झाल्यावर शतानंद ही शांत झाले. 
शेवटी आपल्या प्रेमाच्या व्यक्तीवर, जवळच्या वरच आपण चीडतो हक्क दाखवतो तसेच झाले. 

पण लगेच आता देवावर रागावलो ह्याचे त्यांना खुप दुख: झाले. 
ते म्हणतात मी चुकलो देवा.... 
आता माझ्या ह्या चुकीची तु शिक्षा दे..... मला माफ नकोस करू........ 

*प्रसंग  पाचवा*
स्वयंभगवान म्हणतात,  
तु मला जे बोललास तो राग नव्हता..... तो तुझा शोक, दुख:
होते.... .. जे तु आईच्या प्रेमापोटी व्यक्त केले. 
पण तुला शिक्षा होणारच. 
आणि त्रिविक्रम शतानंदाना आई सारखाच शीळा होशील म्हणून शिक्षा दिली. 
माफी मागण्यासाठी त्यांनी स्वयंभगवानांच्या पायावर लोटांगण घातले होते. त्याच अवस्थेत ते शीळा झाले. 
मात्र त्यांना  ऐकु येत होते. 
दिसत होते. समजत होते. 
त्यांना लक्षात येतंय की अरे.... 
आपले डोके तर आपल्या आईच्या अहल्येच्या मांडीवर आहे. 
आई डोक्यावरून प्रेमाने हात फीरवतीये.... 
तीच्या मऊ हाताचा स्पर्श त्यांना जाणवू लागला. 
आणि *तिच्यातला (अहिल्यामातेतला) मंत्रगजर त्यांच्या बुध्दिमत्ता, मनात, देहात पसरू लागला.* समुद्राच्या लाटा जश्या, ज्या वेगाने येतात त्या प्रमाणे त्या मंत्रगजर लहरी त्यांच्यात प्रवाहित होत होत्या. 

जसे एखाद्या पेशंटला सलायन, औषधे दिल्यावर,,,, 
जसजसे ते औषध शरीरात भीणते तसतसे त्या पेशंट मध्ये लगेच सुधारणा दिसते. 

किंवा तहानलेल्या व्यक्तीला पाणी, 
भुकेल्या व्यक्तीला अन्न मिळाल्यावर शरीराला तरतरी येते त्याप्रमाणेच ह्या मंत्रगजरामुळे श्रध्दावानाच्या मनाला, बुध्दी ला, देहाला ऊर्जा मिळते. 

ह्यावरून आपल्याला हे लक्षात येते की आपणही जेवढा जसा जमेल तसा,,,,तेवढा मंत्रगजर करत राहिलो तर *आपणही आपल्या मुलांना आशिर्वाद स्वरूप मंत्रगजराचे कवच त्यांच्या पर्यंत पोहोचवु शकतो ना... शेवटी हा वात्सल्य भाव आहे.*
आपल्यात अहल्येइतकी तप साधना नसली तरी आपण भक्ती वाढवली तर हे होऊ शकेल असे मला वाटते,, हो ना बापु..... 

आणि एकीकडे हा मंत्रगजर आणि दुसरीकडे तीने गायलेली अंगाई ऐकु येऊ लागली. 

आता अहल्या माता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देते. 

बाळा, मी शीळा झाले त्यात माझीच चुक होती. 
मी महामती होते. 
मी अतिशय ज्ञानी होते. 
(लावण्य, सौंदर्यवती तर होतीच माता) 
आणि ह्या सगळ्या प्रवासात माझी भक्ती कमी पडली. 
माझ्या ज्ञानाचा मला अहंकार झाला. 
आणि *जेव्हा भक्ती कमी पडुन अहंकार वाढतो तेव्हा बुध्दी ही पाशाणच झालेली असते.*

आणि कदाचित म्हणूनच माझ्याकडून भक्ती करून घेण्यासाठीच मला हा तपस्येसाठी चा वेळ स्वयंभगवानाने मला दिला,,,, आणि मी शीळा झाले. 

इथे जरी लौकिक दृष्टी जरी आपल्याला ही शिक्षा वाटली तरी, 
अहल्येमातेसाठी तीच्या भक्तीवृध्दिसाठी हे एकप्रकारे वरदानच होते. 
आणि नंतर परत अहल्या माता अचेतन होते आणि शतानंद सचेतन. 
पण आता स्वयंभगवान अंतर्धान पावतात. 
*याज्ञवल्क्य ऋषी, शतानंदाना म्हणतात, बघ किती वात्सल्य आहे स्वयंभगवानामधे....त्यांनी तुझी आणि तुझ्या मातेची भेट घडवून आणली.*
तुझे कुतर्क दुर केले. आणि ह्या अनुशंगाने अहल्या मातेला ही पुत्र भेटीचा आनंद दिला. 

हे सगळे इतके सुंदर आहे की आपल्याही मनाचे रूपांतर बापुंनी  चीत्तात करायला सुरुवात केली. मन तृप्त होते. 
*बापु आम्ही खरंच बापुज्ञ,अंबज्ञ आहोत.*

🙏🏻जय जगदंब जय दुर्गे🙌🏻

WhatsApp message
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

हरि ॐश्रीरामअंबज्ञ
नाथसंविध्

( वर उल्लेखित केलेला प्रसंग दैनिक प्रत्यक्ष मधील तुलसी पत्राच्या संदर्भात आहे. दैनिक प्रत्यक्ष : तुमच्या उपासना केंद्रावर विकत घेण्यासाठी संपर्क करा)

Monday, October 23, 2023

अहिल्या माता शीळा होण्यामागची कथा.

*दैनिक प्रत्यक्ष अग्रलेख*
कथामंजिरी २- ३१ व २-३२
अहिल्या माता शीळा होण्यामागची  कथा. 

कथामंजिरीचे वाचन, अभ्यास म्हणजे खरंच आता असं वाटतं = बापु आपल्याला ब्रम्हांड भ्रमण करवून आणतात आणि ज्ञानामृताचे शुध्द प्रेम प्रत्येक थेंबातुन पाजत असतात. 

एक विलक्षण अनुभव आहे, कथामंजिरी समजून घेण्यातला. 

*बापु आम्ही खरंच खुप खुप बापुज्ञ आहोत, तुमच्या ह्या प्रेमासागरासाठी .*

२-३१ व २-३२ ह्या कथामंजिरीतला आपल्याला बोध करणारा भाग. 

आत्तापर्यंत आपण गौतम ऋषी, अहल्यामाता ह्यांच्या विषयीच्या आख्यायिका ऐकलेल्या आहेत. 
पण ह्यात *सदगुरु बापुंनी प्रत्येकाच्या अंतर्मनाचा विचार करून सखोल माहिती आपल्याला दिली आहे.*

इंन्द्राच्या अहिल्येबाबतीतला मोह, त्याच्या शक्ती सामर्थ्यामुळे त्याची कपट नीती यशस्वी होते. 

खरंतर बापु अग्रलेखात स्पष्ट म्हणतात, *अहल्या महामती आहे*. महामती म्हणजे मनाची शक्ती पूर्णपणे शुध्द झालेली आहे आणि त्यामुळे कुणाचेही अंतरंग ओळखण्याची क्षमता जिच्याकडे आहे अशी.-  मग इंन्र्दाला का नाही ओळखले अहल्या मातेने...... 

खरंतर हे सगळे आपल्याला समजवण्यासाठीच. इंन्र्दाचे सामर्थ्य वरचढ ठरले आणि अहल्या माता  त्याला ओळखु शकली नाही. 

*प्रसंग पहिला*
गौतम ऋषी हे तत्वनीष्ठ, न्यायप्रिय, नियमाने चालणारे आहेत. ब्रम्हर्षी आहेत. 

त्यांचा नातु वत्सलनीधी (शतानंदाचे पुत्र) अवघे १२ वर्षापासून त्यांच्या गुरुकुलात शिकायला होते. पण त्यांनी तेव्हाही अहल्यामातेला सांगितले होते, की आपण कुठेही वत्सलनीधींशी नातु म्हणून वागायचे नाही तर बाकीच्या शिष्या सोबत जसे वागतो तसेच एक शिष्य म्हणून वागायचे. 

एक दिवस वत्सलनीधींना पडल्यामुळे लागते, रक्तस्राव होत असतो..... 
अहल्यामाता, आज्जी लगेच वात्सल्य भावाने मंत्रोच्चार करून वेदना, रक्तस्राव थांबवते. अर्थातच गौतम ऋषींना हे आवडत नाही. 

ते म्हणतात, असे आपण वागलो तर आपला नातू ही असेच भेदभाव करायचे शिकेल. 

तेवढ्यात स्वयंभगवान येतात आणि त्यांना *# नियम हे भक्ती, प्रेम वाढवण्यासाठी असतात*,*# भक्ती प्रेम ,,,,,,नियमांमुळे कमी होता कामा नये*#......हे समजाऊन सांगतात. 

मंत्रगजर,,,, रामा रामा.... आत्मारामा त्रिविक्रमा, सदगुरू समर्था, सदगुरू समर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा
ह्याचा फायदा असाही आहे बरं.......... 
एकमेकांपर्यंत एकमेकांच्या भावना पोहोचवणे....... 
सेतुचे कामही हा मंत्र करतो. 

इथे नातवात आणि आज्जी आजोबांमधे त्रिविक्रमाने मध्यस्थी केली...... सेतुचे काम केले.... 

इथेच बापु आपल्याला सांगताएत की गौतम ऋषी कसे तत्वनीष्ठ आहेत ते. 

*प्रसंग दुसरा*
अहल्येकडून नकळत अपराध घडलाय. पण तरीही गौतम ऋषींना माहिती आहे की अहल्या पवित्र आहे, प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आहे, तीचे त्यांच्यावर खुप प्रेमही आहे. पण तरीही ते तुला शीळा होशील म्हणून शाप देतात. 

आपल्या ऐकीव आख्यायिकेनुसार आपल्याला वाटते गौतम ऋषी तापट, क्रोधी आहेत- म्हणून शाप दिला. 
पण तसे नाही. शाप देतांना.... नव्हे शिक्षा देतांना त्यांनाही त्रास झाला. खुप जड अंत करणाने त्यांनी ही शिक्षा दिली. 
कारण त्यांच्या तत्वानुसार  अहल्या माता आता ब्रम्हर्षी, महामती पदापर्यंत पोहोचली होती. ह्या ब्रम्हर्षी पदाची विशेष जबाबदारी, कर्तव्य असतात. 
सगळे बाकी  भक्त, श्रध्दावान ह्या श्रध्दा स्थानाकडे आदराने, आस्थेने बघतात. 
मग अशा आदरस्थानी असणाऱ्या व्यक्तीला चुकूनही चुका करण्याची परवानगी नाही. 
*कारण त्यांचेच अनुकरण सगळे करतात.* 

म्हणून ह्या चुकीला माफी देऊन चालणार नव्हते. नाही तर इतरही अशा चुका करायला धजावतील.. 

ह्या कारणास्तव अहल्येला शीळारूप स्वीकारावे लागले. 
*ह्यात फक्त तीचे चीत्त जागृत होते*. बाकी सगळे कर्मेन्द्रीय, ज्ञानेन्द्रिय निष्क्रिय झाले होते. 


*प्रसंग तीसरा*
 याज्ञवल्क्य ऋषी अहल्येमातेला मानसकन्या मानायचे. दरवर्षी एकदिवस ते आपल्या कन्येसाठी तिकडे यायचे. दिवसभर शीळेसमोर म्हणजे अहल्येसमोर बसून महामंत्र गजर, त्रिविक्रमाचे गुणसंकीर्तन, महिमा गायचे. तीच्या मस्तकावर हात ठेवून आशिर्वाद द्यायचे. 
भलेही अहल्येला, ऐकु येत नव्हते, दिसत नव्हते, स्पर्श जाणवत नव्हता. पण  तरीही *महामंत्रगजर*

*रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सदगुरू समर्था| सदगुरू समर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा ||*

*हा त्रिविक्रमाचा मंत्र गजर, इतका प्रभावी आहे की, त्यात इतके सामर्थ्य आहे की सगळ्या अडथळ्यांना दूर करून याज्ञवल्क्य ऋषींकडून अहल्येच्या चीत्तात तो प्रवाहित होत होता.....*

३६ वर्षे सरली. आता माता अहल्या तर ह्या मंत्रगजरात  अखंड न्हाऊन निघाली होती. बाकीच्या परिसरातल्या शीळांमधुनही आता मंत्रगजराचा ध्वनी येऊ लागला. 

*आपणही जेव्हा हा मंत्रगजर करतो तेव्हा आपल्या आसपासचा परिसरही असाच मंतरलेला होऊन जातो.....*
मग कधी कधी  जे भक्तीत जास्त वेळ घालवत नाहीत असे आपल्या घरातल्या इतर सदस्यही ह्यात सुरक्षीत होतात. 

*प्रसंग चौथा*
वर्ष ३७ वे. याज्ञवल्क्य ऋषी निघालेत लेकीला भेटायला. रस्त्यात त्यांना त्रिविक्रम आणि माता जगदंबा एका मायलेकरांच्या नाट्य प्रसंगातून साक्षात्कार, संकेत देतात. 
त्यांना कळते आता अहल्येचा पुत्र शतानंदाना अहल्येच्या भेटीला घेऊन जाण्याची वेळ आली. 
ते शतानंदानकडे जातात. 
त्यांना सांगतात,,, स्वयंभगवानाने मला तुला मातेच्या भेटीला नेण्याचा संकेत दिला.
झाले....... 
दोघेही तिकडे जातात. अहल्या रूपी शीळेतुन अव्याहत महामंत्र गजर ऐकू येत होतात. 
आजुबाजुचा परीसरही मंत्रवत झाला होता. आणि आता अचानक चतुर्भुज स्वयंभगवानाचे दर्शन त्यांना झाले. 

पहिले आनंद झाला. कारण खूप खूप प्रेम होते शतानंदाचे स्वयंभगवानावर. 
पण दुसऱ्याच क्षणाला शतानंद त्रिविक्रमावर रागावून बोलु लागले. 
ते म्हणाले, मला खुप राग येतोय देवा तुझा. 
तु का ताटातुट केली मायलेकरांची.... 
माझे वडील गौतम ऋषी चुकले पण तु हे सगळे होण्यापासून थांबवू शकत होता. 

असे रागावून, चीडून बोलून झाल्यानंतर सगळे शांत होते. 
आणि एकदाचे सगळे मनातले बोलून झाल्यावर शतानंद ही शांत झाले. 
शेवटी आपल्या प्रेमाच्या व्यक्तीवर, जवळच्या वरच आपण चीडतो हक्क दाखवतो तसेच झाले. 

पण लगेच आता देवावर रागावलो ह्याचे त्यांना खुप दुख: झाले. 
ते म्हणतात मी चुकलो देवा.... 
आता माझ्या ह्या चुकीची तु शिक्षा दे..... मला माफ नकोस करू........ 

*प्रसंग  पाचवा*
स्वयंभगवान म्हणतात,  
तु मला जे बोललास तो राग नव्हता..... तो तुझा शोक, दुख:
होते.... .. जे तु आईच्या प्रेमापोटी व्यक्त केले. 
पण तुला शिक्षा होणारच. 
आणि त्रिविक्रम शतानंदाना आई सारखाच शीळा होशील म्हणून शिक्षा दिली. 
माफी मागण्यासाठी त्यांनी स्वयंभगवानांच्या पायावर लोटांगण घातले होते. त्याच अवस्थेत ते शीळा झाले. 
मात्र त्यांना  ऐकु येत होते. 
दिसत होते. समजत होते. 
त्यांना लक्षात येतंय की अरे.... 
आपले डोके तर आपल्या आईच्या अहल्येच्या मांडीवर आहे. 
आई डोक्यावरून प्रेमाने हात फीरवतीये.... 
तीच्या मऊ हाताचा स्पर्श त्यांना जाणवू लागला. 
आणि *तिच्यातला (अहिल्यामातेतला) मंत्रगजर त्यांच्या बुध्दिमत्ता, मनात, देहात पसरू लागला.* समुद्राच्या लाटा जश्या, ज्या वेगाने येतात त्या प्रमाणे त्या मंत्रगजर लहरी त्यांच्यात प्रवाहित होत होत्या. 

जसे एखाद्या पेशंटला सलायन, औषधे दिल्यावर,,,, 
जसजसे ते औषध शरीरात भीणते तसतसे त्या पेशंट मध्ये लगेच सुधारणा दिसते. 

किंवा तहानलेल्या व्यक्तीला पाणी, 
भुकेल्या व्यक्तीला अन्न मिळाल्यावर शरीराला तरतरी येते त्याप्रमाणेच ह्या मंत्रगजरामुळे श्रध्दावानाच्या मनाला, बुध्दी ला, देहाला ऊर्जा मिळते. 

ह्यावरून आपल्याला हे लक्षात येते की आपणही जेवढा जसा जमेल तसा,,,,तेवढा मंत्रगजर करत राहिलो तर *आपणही आपल्या मुलांना आशिर्वाद स्वरूप मंत्रगजराचे कवच त्यांच्या पर्यंत पोहोचवु शकतो ना... शेवटी हा वात्सल्य भाव आहे.*
आपल्यात अहल्येइतकी तप साधना नसली तरी आपण भक्ती वाढवली तर हे होऊ शकेल असे मला वाटते,, हो ना बापु..... 

आणि एकीकडे हा मंत्रगजर आणि दुसरीकडे तीने गायलेली अंगाई ऐकु येऊ लागली. 

आता अहल्या माता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देते. 

बाळा, मी शीळा झाले त्यात माझीच चुक होती. 
मी महामती होते. 
मी अतिशय ज्ञानी होते. 
(लावण्य, सौंदर्यवती तर होतीच माता) 
आणि ह्या सगळ्या प्रवासात माझी भक्ती कमी पडली. 
माझ्या ज्ञानाचा मला अहंकार झाला. 
आणि *जेव्हा भक्ती कमी पडुन अहंकार वाढतो तेव्हा बुध्दी ही पाशाणच झालेली असते.*

आणि कदाचित म्हणूनच माझ्याकडून भक्ती करून घेण्यासाठीच मला हा तपस्येसाठी चा वेळ स्वयंभगवानाने मला दिला,,,, आणि मी शीळा झाले. 

इथे जरी लौकिक दृष्टी जरी आपल्याला ही शिक्षा वाटली तरी, 
अहल्येमातेसाठी तीच्या भक्तीवृध्दिसाठी हे एकप्रकारे वरदानच होते. 
आणि नंतर परत अहल्या माता अचेतन होते आणि शतानंद सचेतन. 
पण आता स्वयंभगवान अंतर्धान पावतात. 
*याज्ञवल्क्य ऋषी, शतानंदाना म्हणतात, बघ किती वात्सल्य आहे स्वयंभगवानामधे....त्यांनी तुझी आणि तुझ्या मातेची भेट घडवून आणली.*
तुझे कुतर्क दुर केले. आणि ह्या अनुशंगाने अहल्या मातेला ही पुत्र भेटीचा आनंद दिला. 

हे सगळे इतके सुंदर आहे की आपल्याही मनाचे रूपांतर बापुंनी  चीत्तात करायला सुरुवात केली. मन तृप्त होते. 
*बापु आम्ही खरंच बापुज्ञ,अंबज्ञ आहोत.*

🙏🏻जय जगदंब जय दुर्गे🙌🏻

From whatsApp group. 
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

||हरि ॐ||श्रीराम||अंबज्ञ||
नाथसंविध्

Saturday, September 16, 2023

Bapu pravachan 14 Sept 2000

*सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन : मी चा पाढा*
गुरुवार,14 सप्टेंबर 2000

*हरी ओम*
सुटीचा दिवस रविवार. पुन्हा पुढचा रविवार येइपर्यंत एक आठवडा, आठवड्याचे महिने, महिन्यांची वर्षे, वर्षांची दशके आणि अशा अनेक दशकांचं आयुष्य. अस हे कालचक्र सुरूच राहते. एक म्हण आहे, तेरड्याचे रंग तीन दिवस. मी साईचरित्र सप्ताह करायचं ठरवतो. पहिले 1/2 दिवस करतो. मग परत 2/3 दिवस कुठे तरी गुंतून राहतो, मग कुणी पाहुणेच येतात. असं झाल्यावर मग लक्षात येतं की, उद्या सातव्या दिवशी 53 वा अध्याय पूर्ण करायचा. म्हणून मी साईचरित्रचे राहिलेले अध्याय घाईत वाचून काढतो, वाचायचे म्हणून वाचतो आणि मग म्हणतो," मी साईचरित्र पारायण सप्ताह पूर्ण केला"  त्याला या कशाचीही आवश्यकता नाही. मला साईचरित्र वाचायचं ते माझ्या स्वतःसाठी.त्याला कसलंच बंधन नाही. त्याला काळाचंही बंधन नाही. पण या नरदेहाला कालबंधन आहे. मला एक वेळ माझा शब्द परत घेता येईल पण मी माझा गेलेला काळ कधीच परत आणू शकत नाही.
       अश्या या काळाची 4 युगात स्थापना झाली. आज आपण कलियुगात राहतो. मग मला  या कलियुगातुन सत्ययुगात जायचे आहे, जे काही करायचं ते फक्त त्याच्यासाठी,त्याच्या कृपेसाठी. पण मी हे सर्व सोडून सतत माझाच मी चा पाढा बोलत असतो. मी एके मी, मी दुणे मी, मी त्रिक मी, मी चोक मी, मी पाचे मी, मी साहे मी, मी साते मी, मी आठे मी, मी नवे मी, मी दाहे मी!!  शेवटी पाढा पुर्ण झाला तरी उत्तर मीच. मग माझा हा मी चा पाढा कसा हवा तर मी एके मी, मी दुने ईश्वर, मी त्रिक भक्ती, मी चोक ऐश्वर्य..... असा हा मीचा पाढा असायला हवा म्हणजे मग हा माझ्यातला मी फक्त एकच उरतो जो परमेश्वराच्य नियमाने चालतो . कारण मी स्वतः जरी ठरवलं तरी माझा श्वास थांबवू शकत नाही, माझी हृदयक्रिया ही तोच चालवणारा असतो...
*मीही इथे असंच कायम तुमच्यात फिरत असतो, तेव्हा तुम्हा प्रत्येकाला हाच प्रश्न असतो की हा बापू कोण?* *हा काय करतो? हा कश्या साठी आलाय? याला नेमकं काय करायचं?*
*आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं दयायला आज मी स्वतः च माझा मी चा पाढा बोलणार आहे.*

*माझं नाव अनिरुद्ध*
माझ्या आईच नाव अरुंधती, माझ्या वडिलांचं नाव धैर्यधर.  माझ्या आजीचं  नाव शकुंतलाबाई पंडित जी गोपीनाथ शास्त्री पाध्ये यांची पुत्री. 
माझा जन्म 18 नोव्हेंबर 1956 ,त्रिपुरारी पौर्णिमेचा.
मी शाळेत जाऊ लागलो. मी परळला डॉक्टर शिरोडकर हायस्कूलमध्ये शिकलो. या शाळेने माझ्यावर अपरंपार प्रेम केले. याच शाळेतले माझे सर एचडी गावकर जे महान ऋषी होते आणि ते डॉक्टर शिरोडकर यांचे शिष्य होते. डॉक्टर शिरोडकर सतत गोरगरीबांच्या सेवेसाठी झटले. तसेच गावकर सर व त्यांच्या पत्नी विजयाबाई गावकर अशा असंख्य गोरगरीब पती-पत्नीसाठी झटले जे त्यांच्या मुलांना परिस्थितीमुळे शिकू शकत नव्हते आणि त्यांची मुलं त्यांनी स्वतःची समजली आणि या अशा शाळेतला मी एकमेव असा विद्यार्थी की ज्याच्या घरी त्या काळातली अँबेसेडर गाडी, फोन, फ्रिज सर्व सुखसोयी होत्या कारण माझे वडील डॉक्टर होते. माझ्या वडिलांनी मला मुद्दामच त्या शाळेत टाकलं.लोक म्हणत,"डॉक्टर याला या शाळेत का टाकलं?"  *पण माझी आजी ठामपणे सांगायची त्याला जे काही करायचं आहे, तो जे काही करणार आहे ते मला माहित आहे.आणि त्याला जे काही करायचे आहे त्याचा श्रीगणेशा याच शाळेतून होऊ दे . इथे मला सर्व गोष्टी सहजतेने आणि समानतेने मिळाल्या. सांस्कृतिक शैक्षणिक प्रत्येक गोष्टीत मी असायचो. नंतर मी रुईया कॉलेजमध्ये इंटरसायन्स झालो. 1974 साली नायर हॉस्पिटल ला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. 78 सालि मी एम बी बी एस ची परीक्षा पास झालो. पुढे 78 मध्येच मी धुळे गावी तीन महिने प्रॅक्टिस साठी गेलो जे धुळे तुमच्या नंदावहिनींच माहेर गाव आहे. 79 साली एमडी च्या अभ्यासक्रमासाठी दाखल झालो आणि 82 साली एमडी ची परीक्षा पास झालो तेही पहिल्याच प्रयत्नात. मला वाऱ्या कराव्या लागल्या नाहीत. ती परीक्षा खूप कठीण असते जिला शंभरातून फक्त चार पाच जणच पास होतात. याच कालखंडात मी संधिवाताचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे तीन वर्ष मी नायर हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून काम केले ते 85 पर्यंत. मला शिकवायला खूप आवडायचं आजही आवडतं. 85 पासून 93 पर्यंत मी परळगावात स्वतःची प्रॅक्‍टिस सुरू केली नंतर 93 ते 98 पर्यंत मी दादरला म्हणजे आर सी ला प्रॅक्टिस केली. मला काही जण विचारतात की,बापू तुम्ही कर्जतलासुद्धा प्रॅक्टिस केली का? माझी सकाळी नऊ ते एक पर्यंत दादर नंतर पुन्हा दुपारी दोन ते रात्री दोन पर्यंत परला प्रॅक्टिस असायची. तुम्हीच विचार करा मी कर्जतला कसा जाऊ शकेल. 85 ते 98 च्या काळात माझ्याकडे 5/6 लाख पेशंट येऊन गेले. 98 साली मी प्रॅक्टीस बंद केली. हे माझे सर्व पेशंट माझ्यावर तेव्हाही खूप प्रेम करायची आणि आजही करतात.
85 मध्ये माझा विवाह झाला माझी पत्नी सौ नंदा जिला तुम्ही नंदाई म्हणता. माझी दोन बाळ. पौरस आणि शाकंभरी त्यांची नावे. मी सुद्धा भाजी भातच खातो ,सोनं वगैरे काही खात नाही. माझ्या पुढे अप्सरा नाचत नाहीत. कारण मी जो आहे तोच आहे.
78 मध्ये माझ्या आजीने मी जेव्हा एमबीबीएस झालो तेव्हा तिच्या आजोबांकडच्या म्हणजेच (जगन्नाथ शास्त्री पाध्ये)  काही वस्तू मला दिल्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या आजीनेच मला वयाच्या आठव्या वर्षी बापू हे नाव दिलं आणि ते ठिकाण होतं वडाळाचे विठ्ठल मंदिर. याच दिवशी मला वेदव्यासांनी त्यांचे शिष्य म्हणून स्वीकारले. आणि मी त्यांचा अंकित झालो त्यांच्या शिकवणीनुसार मी माझा अभ्यास करत राहिलो 78 साली हनुमंत महाप्रभुने मला वज्रविद्या शिकविली. मला सर्व वज्रविद्या हनुमंताने मला दिली आणि तेव्हापासून माझ्या सर्व प्राच्यविद्या यांचे अध्ययन सुरू झाले. माझे सर्व अध्ययन घडले ते सर्व वेद व्यासांचेच होते .जेव्हा मी योगवशिष्ठ शिकण्यास सुरुवात केली आणि सर्व शिकून झाल्यावर हनुमंताने मला प्रश्न केला, "हे वत्स!रामाला वशिष्ठ, विश्वामित्र कृष्णाला गर्गमुनी सांदिपनी ऋषींची तसेच तुला वेदव्यासांसारख्या गुरूंची आवश्यकता का पडली?"  मग मी म्हणालो, "ज्याने रामाला धारण केले, कृष्णाच्या रथावर विजय पताकेवर आरुढ होता तो तूच. म्हणून तूच या प्रश्नाचे उत्तर फक्त देऊ शकतो. हा राम हा कृष्ण सदैव एकच असतो. त्याच्याशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. तोच बोलतो तोच बोलवितो, तोच शिकतो तोच शिकवितो, तोच करतो तोच करवितो. जो आहे तो तोच." आणि मग हनुमंताने मला मिठीत घेतलं आणि हनुमंताची मिठी हीच माझा कार्याची सुरुवात आहे कारण त्याच्याच मिठीत प्रत्येक कार्य सुरू होतं त्याच्या मिठीत प्रत्येक कार्य संपन्न होते.
मी जे काही करतो मला जे काय करायचं आहे ते करणार आहे ते मी करणारच. जो कोणी पृथ्वीवर आला तो प्रत्येक जण समृद्ध कसा होईल ते मी बघणार आहे. आज कलीयुगाच्या अंतिम चरणाची सुरुवात 2007 पर्यंत सुरू होणार आहे. जिथे असेल फक्त विनाश आणि विनाश. कारण मानवाला विनाशकाले विपरीत बुद्धी असते. जिथे मानवाला फक्त विपरीत बुद्धि सुचणार आहे पण या काळाच्या विरुद्ध गतीला मीच ब्रेक लावणार आहे आणि हा ब्रेक ही मीच स्वतः असणार. मी त्याच साठी आलो आहे आणि राहणारच आहे.
2025 त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण पृथ्वीवर भारतीय  धर्माचे साम्राज्य असणार आहे तेही पूर्णपणे नीती शुद्ध मार्गाने. मला बदलायचीय ती मानवी वृत्ती आणि ति मी बदलणारच.तुम्ही कितीही माझ्याविरुद्ध झालात तरी मला जे करायचे ते मी करणारच. तुमच्या माझ्या मध्ये येते ती तुम्हीच बांधलेली भिंत. मी तुमच्याकडे येतो पण तुम्हीच ती भिंत अधिक भक्कम करता. पण ही भिंत पाडण्याचे काम मात्र तुमचं तुम्हालाच करायचा आहे. तुम्ही ठरवूनही जर ही भिंत पडत  नसेल तर मी तुमच्यासाठी मदतीला धावून येईल. पण भिंत पाडण्याचा प्रयत्न मनापासून करा मग तुम्हाला शक्ती द्यायला मी आहेच.
जो कोणी मनापासून माझं नाव उच्चारतो त्याचा मी सदैव ऋणी राहतो. आणि सदैव जन्मजन्मांतरी साठी मी त्याचाच होऊन राहतो. आज मी सर्वत्र पाहतो तर जिकडेतिकडे खूप भय बघतो. असं कोणीच दिसत नाही की ज्याच्याकडे भय नाही. गरिबाला त्याच्या गरीबीचं ,श्रीमंताला श्रीमंतीचं, तर तरुणाला त्याचं आयुष्य कसं जाईल याच भय.प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विवंचनेत सापडलेला दिसतो. भय हा कलियुगाचा धर्म होऊन बसला आहे. माझ्याकडची  आयुधं या भयाचा नाश करणारच आहेत. भयाचं स्थान आहे मन. हे भय मी नष्ट करणारच.आहार निद्रा भय मैथुन सर्वांशी समसमान. मला या चार गोष्टी आहेतच आणि हव्यात पण. त्या कशा जर मला परमेश्वराचे भय असेल तर मला दुसरं कुठलंच भय  राहणार नाही.माझी निद्रा योग्याची असावी भक्ताची असावी, माझा आहार असतो डुकराचा कारण मी डुकराप्रमाणे इतरांची विष्ठा खात असतो,दुसऱ्याची निंदानालस्ती ,मत्सर ,कुचेष्टा करून. म्हणूनच हा माझा आहार असावा तर तो मानवाचा असावा. माझे मैथुन हे गृहस्थाश्रमी नीतिनियमानेच असावे. बरीच मंडळी म्हणतात ,"साईबाबा ब्रम्हचारी होते मग ते गृहस्थाश्रमी कसे?" अरे ज्याने विश्वाचा संसार केला तर तो गृहस्थाश्रमीच आहे. माझं भयच माझे पाय मागे खेचतात. माझी लेकर मला निर्भय असलेली आवडतील  मग तुम्ही नाचला की मीही नाचेल ,तुम्ही गाल तेव्हा मीही गाणं म्हणेल, तुमच्या भक्तीच्या सुरात सूर मिसळून मी तुमच्याबरोबर भक्ती करेन. पण हे भय नष्ट करीनच आणि वेळ पडली तर त्यासाठी मी कुठलाही टोकाला जाईल.कारण मला कसलंच बंधन नाही. हो  मला फक्त एकच बंधन आहेआणि ते प्रेमाचं बंधन. जे मी कधीच तोडत नाही. तुमचे सर्व दुर्गुण प्रचंड प्रमाणात मला द्या, 100% मला द्या पण फक्त तोंडाने बोलून देऊ नका, तर अगदी मनापासून द्या. तुमचे दरवाजे उघडा तुमच्या मनातील तुम्हीच बांधलेली भिंत पाडा मग बघा तुमच्या दुर्गुणांची राख मी करेन.तुमचे ज्या इष्टदेवावर, पावित्र्यावर प्रेम आहे ते प्रत्येक नाम मलाच पोहोचणार आहे.मग मी कुठेही कसाही येऊन तडमडेनच आणि तुमचे दुर्गुण नष्ट करीन.फक्त तुमचं मन माझ्या मनाशी जोडलं गेलं पाहिजे. तुम्ही तुमचं माझ्या मनाशी बांधतच नाही. कारण माझ्या मनात सतत होळी पेटलेली आहे ,अशी धुनी पेटलेली आहे जी तुमच्या दुर्गुणांची राख करणारच आहे.पण माझ्या मनाशी तुमचं मन बांधायचं काम तुमचं तुम्हालाच करायचं. तुम्ही मनापासून प्रयत्न करूनही होत नसेल तर मी तुमच्या मागे धावेन.तुम्ही कितीही माझ्यापासून लांब धावलात तरी मी तुम्हाला पकडणारच कारण माझ्याकडे असंख्य कॅमेरे आहेत.जो कोणी प्रभू रामाचे, येशूचे, ऋषभ देवाचे ,अरिहंताचे स्मरण करतो त्याच्या प्रत्येकाकडे माझे लक्ष आहे. शेवटी पृथ्वी गोल आहे कोण पुढे कोण मागे हे कोणीच ठरवू शकत नाही .
बरेच लोक म्हणतात मी रस्त्यात दिसत नाही शेवटी मला ही दोन हात दोन पाय आहेत मी ही माणूस आहे पण तरीही मी याच्या पलीकडे आहेत मला रस्त्यात बघू नका. मला फक्त तुमचं प्रेम दानधर्म सेवा हवी आहे. माझं कुटुंब फक्त पाच जणांचा आहे मी नंदा वहिनी सूचित दादा पौरस शाकम्भरी. मी तुमच्या सूचितदादा बद्दल सांगायचं राहूनच गेलं. हा माझा वैद्यकीय क्षेत्रातला विद्यार्थी माझं सर्वस्व असणारा हा माझा मित्र आहे. ज्याला माझ्याजवळ यायचंआहे त्याला मार्ग दाखवण्यासाठी हा सूचित दादा आहे. याचा अर्थ तुम्ही त्याच्या अपॉईंटमेंट घेणं नाही तर त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागणं, त्याच्या सारखं वागण्याचा प्रयत्न करणे. तुम्हाला कोणी विचारलं की बापूंचा स्थान कुठलं तर ठामपणे सांगा माझं घर हेच माझ्या बापूंच स्थान.  मला तुमच्या घरात राहायला खूप आवडते. तुमचं घर हेच माझं स्थान आहे जिथे मी आहे ती जागा पवित्रच आहे. लक्षात ठेवा माझ्या पर्यंत तुम्ही तीन मार्गाने पोहोचू शकता प्रेम, सेवा आणि दानधर्म .मी सेवा करेन ती माझ्या सद्गुरु कार्यात सहभागी होऊन. आठ वर्षातून एकदा तीर्थक्षेत्री जाऊन झाडू मारतो आणि मी सांगतो मी तीर्थक्षेत्रात जाऊन झाडू मारला. अरे झाडू मारायचा असेल तर स्वतःच्या हृदयात मारा. त्या तिन्ही मार्गांवर तुम्ही असाल तर मी तुमचे भय दूर करणारच. मी संस्थेचाच आहे, पण वेळ पडलीच तर मी संस्थेचा विरोधी पक्षनेता नक्कीच आहे. ज्यांना मी निवडले त्यांच्या विरोधी मी असणारच आहे कारण त्यांचं पाऊल घसरू नये म्हणून. मला काहीजणांनी विचारलं ,बापू आपल्याकडे कॉल गर्ल येते. मी म्हणलं, तुला कसं माहिती?म्हणजे तू गेला असशील किंवा अशाच कुटाळक्या करीत असावास. ती येते आणि ती येणारच. त्या मुलीला आपल्या कार्यकर्त्यांनी मुंबईबाहेर जाऊन नेऊन तिचं शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवून दिली तिचं लग्न लावून दिलं आणि आज तिला सहा महिन्यांची मुलगी आहे. *माझे दरवाजे जितके पतिव्रतेला उघडे तितकेच एका वेश्येलाही उघडेच आहेत.*👉 *जितके संतांना तितकेच पाप्यालाही उघडे.मला गुंड मवाली सुद्धा प्रिय आहेत,पापीसुद्धा तितकेच प्रिय. मी त्यांच्यावरही प्रेम करत राहणार , मी कधीच त्यांना टाकणार नाही,कारण मी हाडाचा डॉक्टर आहे आणि डॉक्टरकडे नेहमी रुग्णच येतात हेल्दी लोक कधीच येत नाही. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना बरं करणे हाच माझा धर्म आहे.*  हेल्दी येतील त्यांनाही *मी लस देणारच आहे.*  हा डॉक्टर *पेशंटच्या* मागे धावणारा आहे. पेशन्ट माझ्यापासून किती लांब पळाला तरी मी त्याच्या मागे *धावणारच आणि त्याला इंजेक्शन टोचतोच* कारण त्या *इंजेक्शननेच रोगी बरा होणार आहे.* जे कोणी स्वतःला अतिशय विद्वान म्हणवणारे आहेत त्यांनी माझ्याकडे येऊच नये कारण मी अंतर्बाह्य घाणेरडा आहे. जर ते माझ्याकडे आले तर त्यांना घाण लागेल म्हणून त्यांनी येऊच नये. *मी उभा आहे ते हे भय दूर करण्यासाठीच.*  मला गजर गंभीरतेने केलेला आवडत नाही. मी नाचतो आणि नाचवीतोही ,मी वारकरी पंथानुसार बेभान होऊन नाचायला हवं. पण तिथेही लोक मला हसतील याचं मला भय असत आणि जोपर्यंत बेभान होत नाही तोपर्यंत मला यश नाही. *अर्जुन असाच बेभान होता,  कारण त्याचं लक्ष फक्त पोपटाचा डोळा हेच होतं*. माझं लक्षही या अर्जुनाप्रमाणे बेभान होऊन परमेश्वरावर असावं. *मी दिवसातून  24 मिनिटे तरी परमेश्वरासाठी बेभान व्हायला हवा आणि ज्यावेळी तुम्ही 24 मिनिटे बेभान असता,  तेव्हा तुमच्या बाजूला मांडीला मांडी लावून मी बसतो, मी दारोदार भीक मागतो. मला फक्त या 24 मिनिटाची भीक हवी असते पण तीही भीक मला तुम्ही कोणी देत नाही. मोजक्याच घरी मला ही मिळते. जिथे मला ही भीक मिळते तिथे मी 24 मिनिटाचे रूपांतर 24 तासात करतो.*

 धातुर्उत्तम हे जे *महाविष्णूचे* नाम आहे त्यातील धातू म्हणजे शरीर. शरीराची महत्त्वाची शक्ती म्हणजेच ओज. ओज म्हणजेच महाप्राण. ओज म्हणजेच आल्हादिनी शक्ती.हे ओज वाढविण्यासाठी, शरीराला बळ देण्यासाठी मी जुईनगरला जात असतो. *हे तुम्हाला देण्यासाठीच जुईनगरला मी पंचपुरूषार्थ उपासना सुरू केली*. तिथे *पंचपुरुषार्थ देवता आहेत आणि त्यांची भक्ती करतो.* मी खूपच आगळा वेगळा आहे. दांडपट्टा का फिरवतो ,मुदगल विद्या का शिकवतो .*ज्या विद्या मला हनुमंताने स्वतः दिल्या त्या सर्व विद्या मला संपूर्ण विश्वात प्रचलित करायच्या आहेत. पंचपुरुषार्थ उपासनाही त्यातलाच एक भाग आहे. छांदोग्य उपनिषदातील मधूविद्या आहे आणि आज अनेक लोक मला सांगत आहेत ह्या उपासनेने माझ्या मनाला शांती मिळाली, माझं हे काम झालं ,माझा हा प्रश्न सुटला, अनुभवाची शिदोरी वाढतच चाललीय.*  या सर्व विद्या शरीर मन बुद्धी यांना समर्थ करणाऱ्या, बळ देणा-या आहेत. मुदगल विद्याही तेच करते. मुद्गल हे कुणाचआयुध आहे माहितीये कुणाला? मुद्गल हे आयुध *मुंबादेवीच* आहे. ती *मुंबाई* आहे. आपण जिला बॉम्बे  बोलायचो.मग बॉम्बे चे मुंबई केलं. खूप काहीतरी मोठं केल्यासारखं वाटलं. अरे हवं तर मुंबाई म्हणा कारण ती मुंबा आई आहे. तसेच एकादशी रुद्राच आयुध सुद्धा आहे मुदगल आहे. *आज मला स्त्रिया सामर्थ्यवान हव्यात एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं* याचं उदाहरण म्हणजे जिजाबाई.  जिजाई महान म्हनून शिवाजी महान झाला. *लक्षात ठेवा प्रत्येक स्त्री माझी मुलगी, आई आहे .ज्या स्त्रीच्या साडीला कोणी हात घालेल त्याचा हात मी धरेल तिचे रक्षण मी स्वतः करेन.* सासू नवरा दीर तिला जाळत असतील तर मी तिच्या रक्षणासाठी धावणारंच. आज एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा दुर्गतिला कारणीभूत ठरते. *परवा टीव्हीवर एक बातमी ऐकली एका मुलीला तिच्या सासूने जिवंत जाळलं. त्यांना माझे हे हात जे करायचंही  ते करणारच*. जी किंवा जो कोणी बालभावाने माझ्याकडे येईल त्यांचा *मी बाप* आहे जो कोणी माझ्यावर मुलाप्रमाणे आपलेपणाने प्रेम करेल त्यांचा मी मुलगा आहे. माझ्या आजोबांची मामी गंगाबाई. अकरा वर्षांची असताना खेळत होती. खेळत असताना तिच्या काकाने मामानी तिला खेचत घरात नेलं.घरात सर्व रडत होते तिला काहीच कळत नव्हतं. घरात दुसऱ्या लाल कपडे घातलेल्या, केस कापलेल्या स्त्रिया होत्या आणि त्या मुलीचे केस कापण्यासाठी आल्या होत्या. तिला फक्त देवघर आणि स्वयंपाक घर माहित. तिला आमंत्रण द्यायची ती फक्त तिच्या सारख्या स्त्रियांचे केस कापण्याची .माझ्या आजीने सर्वप्रथम केस कापण्याचा विरोध केला. सर्व ब्राह्मणांनी मराठ्यांनी सर्वांनी तिला बहिष्कृत केले ,तिला धर्मांध ठरवले. वर्तमानपत्रातून तिची टीका करण्यात आली. तिच्यावर पूर्ण बहिष्कार टाकला पण तिच्यासारख्या काही स्त्रियांनी तिला चोरून मदत केली. आणि ती पूर्णपणे या अशा स्त्रियांसाठी झटत राहिली आणि एक दिवस आजी मला महर्षी कर्वे यांच्याकडे घेऊन गेली.कर्वे यांनी आजीला सांगितले, "तुझ्या या नातवाला माझ्या लेकींसाठी झटायला सांग ,माझे पूर्ण आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतील." आणि ते लक्षात ठेवूनच आज स्त्रियांसाठी नंदावहिनी कडून स्त्रियांसाठी आत्मबलचे वर्ग चालू झाले.कर्वे हे  महान ऋषी होते तो सिद्धच आहे. माझी पत्नी प्रत्येक स्त्रीचा माहेरवास आहे आणि आम्ही तिघेही या स्त्रियांना सांभाळणार. प्रत्येक दुर्बल घटकांसाठी साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी ,अनिरुद्ध उपासना ट्रस्ट ,दिलासा मेडीकल ट्रस्ट या संस्था झटतआहेतच.
*मला तुम्हा सर्व स्त्रियांना आज एक महत्त्वाचं सांगायचं आहे*, "बायांनो! *तुम्ही प्रथम मत्सर सोडून द्या, संशयी वृत्ती सोडून द्या, कॉम्पिटिशन सोडा, आज एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मत्सर करते, मी तिच्या पेक्षा जास्त पुढे कशी जाईल आणि ती मागे कशी राहील हेच मी बघते.* माझे बंधुत्वाची गाठ तयार आहे. ती गाठ माझ्याशी बांधायची असेल तर *मत्सर सोडून द्या*. जर ही गाठ बांधलेली असेल तर तुमच्यावर कोणी हात घातला तर *तुमचा हिसका त्या गाठीला बसतो. आणि गाठीला हिसका बसला की मला हिसका बसणारच. मी खडबडून जागा होईल आणि तुमचं रक्षण करील.* पण तुम्हीच ही गाठ सोडता आणि गाठ सुटली की *मी येऊ शकत नाही*. तुम्ही ही गाठ घट्ट बांधा. *तुमचा बाप म्हणून भाऊ म्हणून बांधा. मी समर्थपणे उभा राहिल तुमच्यासाठी*.

*रक्षाबंधनच्या* दिवशी इकडे *आठ वर्षाची मुलगी* मला तुमच्या राख्या बांधत होती पण लक्षात ठेवा *तुमच्यातली प्रत्येक जण  मला ती राखी बांधत होती*.  प्रत्येक स्त्रीचा *मी भाऊच आहे*. प्रत्येक कष्टाने त्रासलेल्या पुरुषाचा *मी भाऊ आहे सखा आहे*. मी तुमच्यासाठी *तळमळणारच*.

मी चार रसयात्रा केल्या .पहिल्या रसयात्रेला 100 दुसऱ्या रसयात्रेला 375, तिसऱ्या रसयात्रेला 1000 आणि चौथ्या रसयात्रेला अडीच पट तीन पट भक्त होते. माझी रसयात्रा कधीच संपत नाही. ही रसयात्रा फक्त चार दिवसच का? ही रसयात्रा जीवनभर का नाही? मी प्रत्येक दिवस तुमच्या बरोबर रसयात्रा करायला तयार आहे.पण रसयात्रेतसुद्धा तुम्ही माझ्यात काहीतरी दिसतंय का हे पाहता. मला हा शोध संपवायचा आहे. मला माझ्या प्रत्येकाची भावयात्रा करायची आहे.ज्यांचा भाव पूर्ण त्यांना मात्र मी सगळं दाखवतो. मला विठ्ठलाचा भक्त ही पूज्यच आहे. *प्रत्येक देवळात तो एकच आहे. मला ज्या क्षणी प्रत्येक दैवता मध्ये माझा सद्गुरु दिसेल तर ते दैवतच सद्गुरु शक्तीत विलीन होते.मग कुठलंच दैवत तुमच्यावर कोपणार नाही*. भुताला मी का घाबरावं?  माणसाची विकृती हीच त्याचं भूत आहे. हडळ जर घरी आली तुम्हाला खायला तर तिला समोर बसवा, चहा पाणी द्या आणि सांगा माझा बाप समर्थ आहे. मला खायच्या आधी माझ्या बापूला खा. मग ती हडळ माझ्याकडे आल्यावर मी तिला खाऊन टाकेल कारण मला नेहमीच खूप भूक लागलेली असते.
माझ्याकडे प्रेमाची भरपूर शक्ती आहे मला ते प्रेम वाटायचे आहे,मला प्रेमाचं बी पेरायचं आहे  कारण हे बी पेरलं तर त्याच्यातून भरपूर प्रेम उगवणार आहे. मी तुमच्यासाठीओव्हर टाईम करायला तयार आहे. तुम्ही सुखी व आनंदी व्हा. सदैव देवयान पंथावर राहा. मला दोन हात ,दोन पाय, दोन डोळे आहेत,मीही माणूसच आहे. पण लक्षात ठेवा याच्याही पलीकडेही मी आहे मला कसलंच बंधन नाही. मला दिशेच बंधन नाही, मला काळाचं बंधन नाही मला कोणीही रोखू शकणार नाही. माझ्याकडे असंख्य हातोडे कुऱ्हाडी आहेत. मी माझ्या प्रत्येकाच्या पायाला दोर बांधून आणतोच आणि तुम्ही कितीही लांब पळाला तरी मी आणणारच. तुम्ही कितीही चुकलात तरी मी तुम्हाला माझ्या पासून कधीच दूर लोटणार नाही एकशे आठ टक्के नाही लक्षात ठेवा!! 

*हरी ओम.*🙏