Friday, January 17, 2014

उपनिषदात ते तिघंजण (उत्तम, मध्यम, विगत) विचारतात, ‘सगळं विश्वासावर अवलंबून आहे का?’ त्यावर तो सांगतो, ‘होय, तुमचे मंत्र, उपासना, साधना ही सगळी साधने आहेत तुमचा विश्वास दृढ करण्यासाठी.”ह्या मंत्रातूनच नवार्णव मंत्र तयार झाला - ‘ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चे’
‘विच्चे’ हे अव्यय आहे. आणि, परंतु, पण हे सुद्धा अव्यय आहे. अव्यय म्हणजे ज्यात कर्ताच्या, कर्माच्या, क्रियापदाच्यानुसार बदल होत नाही. ‘विच्चे’ म्हणजे साध्या दर्शनापासून ते तपश्चर्येपर्यंत जे जे म्हणून आपण करतो. ‘विच्चेयति तृतीय नेत्रम्‌’ हा algorithm आहे. हा विच्चेकारच तृतीय नेत्र आहे. जिच्यात सगळं, सर्व मंगल करण्याची ताकद आहे ती तुमचं मंगल करणार नाही का? मला किती मोठी जखम झाली हे महत्वाचं नाही. पण तिची परीक्षा पाहण्यासाठी मुद्दाम जखम करून घेऊ नका. ती जखम कशी भरून काढायची हे बघायचं तुमचं काम नाही. जिने केवळ संकल्पातून जग उत्पन्न केलं, ती काय करू शकते ते तुम्हाला माहीत पडणार का? ती काहीही करू शकते, तिचे मार्ग आम्हाला माहीत नाहीत. तिचा पुत्र काहीही करू शकतो, त्याचे मार्ग आम्हाला माहीत नाहीत. आम्हाला वाटत, आम्हाला पाहिजे त्या मार्गावरूनच त्याने यावं आणि आमची जखम आम्हाला हवी तशी भरून काढावी. आम्हाला तिचा तृतीय नेत्र माहीत पाहिजे. तो रोग बरा करणारा आहे. रोग म्हणजे - injury प्राण, मन, शरीर, बुद्धी, आमच्या अर्थकारणाला झालेला रोग. ‘सर्व मंगल मांगल्ये’ म्हणताना तिचा तृतीय नेत्र बघता आला पाहिजे.
गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणताना मी मंत्र म्हणत नव्हतो, तुम्हीच म्हणत होता पण फरक पडला का? नाही. जर आपण ह्या गुरुक्षेत्रम्‌‍च्या आश्रयाला असलोत तर कितीही वेगळ्या-वेगळ्या गोष्टी घडल्या तरी आपल्या कार्यात काहीही फरक पडत नाही.